AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : पुढील 48 तास राज्यासाठी अत्यंत धोक्याचे; अवकाळीचं मोठं संकट, घराबाहेर पडू नका, आयएमडीकडून हाय अलर्ट

सध्या राज्यभरात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे, देशातील टॉप टेन अतिउष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील चार शहरांचा समावेश आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली असून, हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Weather Update : पुढील 48 तास राज्यासाठी अत्यंत धोक्याचे; अवकाळीचं मोठं संकट, घराबाहेर पडू नका, आयएमडीकडून हाय अलर्ट
Maharashtra Weather UpdateImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 30, 2026 | 9:03 PM
Share

राज्यात सध्या उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. विदर्भ चांगलाच तापला आहे. विदर्भातल्या काही जिल्ह्याचं तापमान हे 45 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. देशातील टॉप टेन उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील चार शहरांचा समावेश झाला आहे. विदर्भातील वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सरासरी तापमानात मोठी वाढ झाली आहे. तर शुक्रवारी देखील विदर्भातील नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भासोबतच मराठवाडा देखील चांगलाच तापला आहे.  दरम्यान तापमान वाढल्यामुळे सध्या दुपारच्या वेळेस रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. नागरिक घराबाहेर पडणं टाळत आहेत.

मात्र उष्णतेमुळे हैराण झालेल्यांसाठी आता दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे  पुढील 48 तासांमध्ये तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. तरी देखील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.  पुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांमध्ये तापमानात घट होऊन विदर्भासह उर्वरीत राज्यात तापमान हे 40 अंश सेल्सिअस ते 38 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान जरी तापमानात घट होणार असली तरी दुसरीकडे पावसाच्या रुपाने महाराष्ट्रावर आणखी एक मोठं संकट आता येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पुढील 24 तास उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र त्यानंतर 2 मे पासून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  2 तारखेनंतर विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांना पावसाचा येलो अर्लट देण्यात आला आहे.  या काळात महाराष्ट्रात  बहुतांश जिल्ह्याचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील अशी माहिती  हवामान विभागाचे शास्त्राज्ञ एस. डी सानप यांनी दिली आहे. दरम्यान काही लोकांकडून तापामानाबाबत समाज माध्यमांवर चुकीचे संदेश पसरवले जात आहेत, नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये, हवामान विभागाकडून अधिकृत माहिती दिली जात आहे,  त्यावर विश्वास ठेवा असं आवाहानही यावेळी त्यांनी केलं आहे.

Follow Us
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.