मराठा समाजासाठी सर्वात मोठी खुशखबर, मराठा-कुणबी मंत्रालयाची मागणी मान्य? जरांगेंनी थेट सांगितलं!

मराठा-कुणबी मंत्रालयाची स्थापना करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे, असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. राठा समाजाच्या मागण्यांना सरकार मान्यता देत आहे ही चांगली बाब आहे. काही प्रमाणात सरकारने निर्णय घेतले आहेत. काही निर्णय घ्यायचे आहेत, असेही मनोज जरांगे म्हणाले.

मराठा समाजासाठी सर्वात मोठी खुशखबर, मराठा-कुणबी मंत्रालयाची मागणी मान्य? जरांगेंनी थेट सांगितलं!
manoj jarange patil and maratha kunbi ministry
Image Credit source: meta ai
| Updated on: Jun 06, 2026 | 2:49 PM

Maratha Kunbi Ministry : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे तसेच शिक्षण आणि नोकरी यामध्ये सुविधा मिळाव्यात यासाठी मनोज जरांगे यांनी मोठा लढा उभारला आहे. नुकतेच त्यांनी अंतरवाली सराटी येथे उन्हात बसून उपोषण सुरू केल्याने सरकारने त्यांच्या बऱ्याच मागण्या मान्य केल्या. सरकारने नुकतेच एक शासन निर्णय काढला आहे. या शासन निर्णयानुसार आता मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणेच सर्व सुविधा लागू होणार आहेत. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे बोलले जात आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी, अशी मागणी केली होती. याबाबतही आता जरांगे यांनीच मोठा दावा केला आहे. मराठा-कुणबी मंत्रालयाची स्थापना करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे, असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो

मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणेच सुविधा मिळतील, असा निर्णय सरकारने घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी बोलताना, मराठा समाजाच्या मागण्यांना सरकार मान्यता देत आहे ही चांगली बाब आहे. काही प्रमाणात सरकारने निर्णय घेतले आहेत. काही निर्णय घ्यायचे आहेत. परंतु जे निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो. मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांचेही मी आभार मानतो, अशा भावना जरांगे यांनी व्यक्त केल्या.

जरांगे यांनी नेमका काय दावा केला?

तसेच, एखादे काम केले तर आम्ही शंभर टक्के श्रेय देणारे आहोत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करण्यासही मान्यता दिली आहे, असा दावे जरांगे यांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाच्या विकासासाठी सरकारने स्वतंत्र असे मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करावे, अशी मागणी केली जात होती. फडणवीस यांनी सरकारने असे मंत्रालय स्थापन करण्यास मान्यता दिल्याचे जरांगे यांनी दावा केल्यामुळे मराठा समाजाच्या लढ्याला आलेले हे सर्वात मोठे यश असल्याचे म्हटले जात आहे.

Follow Us