भारतीयांनी तुमचे काय बिघडवले? 28 भारतीय असलेल्या जहाजावर भीषण हल्ला, ऐन..
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. त्यामध्येच पुन्हा एकदा होर्मुज खाडीत मोठे हल्ले होत आहेत. भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजावर मोठा हल्ला झाला. मात्र, या हल्ला नक्की कोणाकडून करण्यात आला, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

गेल्या तीन महिन्यांपासून मोठा तणाव इराण आणि अमेरिका यांच्यात आहे. सतत युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम जगाला भोगावा लागत आहे. यादरम्यानच होर्मुज खाडीत झोप उडवणारी घटना नुकताच घडली. इराणच्या समुद्रहद्दीत 28 भारतीय नागरिक असलेल्या जहाजावर मोठा हल्ला करण्यात आला. एलपीजी गॅस टॅंकरवर हल्ला करण्यात आला. तेहरानमधील भारतीय दूतावासाने या हल्ल्याची पुष्टी केली. भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, मोजम्बिकचा झेंडा असलेल्या एलपीजी गॅस टॅंकरवर हल्ला झाला. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वजण सुरक्षित आहेत. होर्मुज खाडीत हा हल्ला झाला. मात्र, हा हल्ला नक्की कोणी केला याबाबत माहिती पुढे येऊ शकत नाहीये. हे जहाज फारस खाडीकडे पुढे सरकत होते, त्यावेळी हा हल्ला झाला.
या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा होर्मुज खाडीतील सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. जगातील 20 टक्के गॅस याच रस्त्याने नेला जातो. मात्र, हाच मुख्य मार्ग आता सुरक्षित राहिला नाही. अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव आहे. मोठ्या प्रमाणात होर्मुज खाडीतून जाणाऱ्या जहाजांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. भारतीय जहाजालाही टार्गेट करून मोठे हल्ले होर्मुज खाडीत झाली.
कोणत्याही परिस्थितीमध्ये होर्मुज खाडी सुरक्षित असणे आवश्यक आहे. होर्मुज खाडीत जहाजांवरील वाढलेल्या हल्ल्यांमुळे स्थिती अधिक गंभीर होत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत आहे. होर्मुज खाडीत जहाजांवर हल्ले झाले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी अगोदरच अमेरिकेने इराणला दिली.
इराण आणि अमेरिका यांच्यात काही मुद्द्यावर एकमत होऊ शकत नाही. इराणवर अमेरिका मोठे हल्ले करत आहे. होर्मुज खाडीत होणाऱ्या हल्ल्यानंतर स्थिती अधिक भयंकर होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी होर्मुज खाडी बंद असल्याने जगात कच्च्या तेलाचे मोठे संकट उभे होते, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव सातत्याने वाढताना दिसले.
