AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांवर दु:खाचा डोंगर; डोळ्यात आश्रू, पुण्याचा आक्रोश मोर्चा अर्धवट सोडून परतले

संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी पुण्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे, या मोर्चात सहभागी होण्यासाठी जरांगे पाटील देखील गेले होते, मात्र ते मोर्चा अर्धवट सोडून परतले आहेत.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांवर दु:खाचा डोंगर; डोळ्यात आश्रू, पुण्याचा आक्रोश मोर्चा अर्धवट सोडून परतले
| Updated on: Jan 05, 2025 | 2:56 PM
Share

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, यामुळे आता राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. आज पुण्यात आक्रोश मोर्चाच आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांसोबतच संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील उपस्थित आहे. आतापर्यंत जेवढे मोर्चे झाले, त्या मोर्चाला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील उपस्थित होते. त्यांनी या मोर्चामधून जोरदार हल्लाबोल केला.  आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी केली.

दरम्यान ते पुण्यातील मोर्चात सहभागी होण्यासाठी देखील आले होते. मात्र हा मोर्चा त्यांनी अर्धवट सोडला आहे, आणि ते पुन्हा परतले आहेत. त्यांनी या मोर्चामध्ये आंदोलकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि मोर्चातून माघारी परतले. मोठ कारण समोर आलं आहे, ते म्हणजे जरांगे पाटील यांच्या चुलत भावाचं अपघाती निधन झालं आहे, त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी जरांगे पाटील हे मोर्चा अर्धवट सोडून परतल्याची माहिती समोर येत आहे.

शनिवारी तिघांना अटक  

दरम्यान संतोष देशमुख प्रकरणातील आणखी तीन आरोपींना शनिवारी पोलिसांनी अटक केलं, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक केली, तर त्यांना मदत करणाऱ्या एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे. या तिघांना अटक करून केज न्यायालयात हजर करण्यात आलं, न्यायालयानं त्यांना 18 जानेवारीपर्यंत म्हणजे 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणात वाल्मिक कराड वर देखील आरोप करण्यात आले होते, तो देखील या आधीच पुण्यातच सीआयडीला शरण आला आहे.  संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.