AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर माझ्यासहित अख्ख्या मराठा कुटुंबांचा तळतळाट लागणार; जरांगेंचं कुटुंब संतापलं, सरकारला काय आवाहन केलं?

मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. 18 दिवसांपासून उपोषण करत असलेल्या जरांगेंचं कुटुंबाचा संताप व्यक्त होताना दिसत आहे. त्यांनी सरकारला मोठं आवाहन केलं आहे.

...तर माझ्यासहित अख्ख्या मराठा कुटुंबांचा तळतळाट लागणार; जरांगेंचं कुटुंब संतापलं, सरकारला काय आवाहन केलं?
Manoj JarangeImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 15, 2026 | 3:05 PM
Share

मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा बांधव आहेत. मनोज जरांगे हे गेल्या 18 दिवसांपासून उपोषणावर आहेत. मरणार पण शरण जाणार, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. मनोज जरांगे हे पाच दिवसांत मुंबईला पोहोचणार आहेत. परंतु 18 दिवसांच्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाने त्यांच्या कुटुंबाची चिंता वाढली आहे. त्यांना काही झालं तर माझ्यासहित अख्ख्या मराठा कुटुंबाचा तळतळाट लागेल, अशा शब्दात जरांगेंच्या पत्नीने संताप व्यक्त केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नी म्हणाल्या, मनोज जरांगे यांना मुंबईला जाण्याची वेळ सरकारने आणली आहे. अन्यथा मुंबईला गेले नसते. त्यांनी दोन वेळा गुलाल उधळला. त्यांचा सरकारनेच अपमान केला. मुंबईला जाण्याआधी त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. पत्नी म्हणून कोणाला वाटतं की, आपला नवरा अन्नावाचून राहावा. माझा नवरा राहत आहे. कारण हे सरकारचं अपयश आहे. सरकारने मागण्या मान्य केल्या असत्या, तर त्यांना मुंबईला जाण्याची वेळ आली नसती. एक महिना झाला, त्यांच्याशी बोलणं झालं नाही. सरकारने मुंबईला येण्याआधी तोडगा काढला पाहिजे. उपोषणस्थळी गेल्यापासून ते तिकडेच आहे. मागील 18 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे’.

जरांगेंच्या पत्नी संतापल्या

मनोज जरांगेंच्या जीवाला काही झालं ना, माझ्यासहित लेकरांसहित अख्ख्या मराठा कुटुंबाचा त्यांना तळतळाट लागणार. त्यांच्या तब्येतीची चिंता वाटत आहे. कारण 18-18 दिवस काय माणूस 18 तास देखील बिना अन्न पाण्याचं राहू शकत नाही. आज 18 दिवस झाले, त्यांच्या पोटात नाही. हे सरकारला दिसत नाही का? असा सवाल त्यांनी केला.

मनोज जरांगे पाटील यांची मुलगी म्हणाली, ‘मुलगी म्हणून काळजी वाटत आहे. पण त्यांची मुंबईला जायची तिसरी वेळ आहे. 18 दिवसांचं उपोषण सुरू आहे. सरकारच्या अपयशामुळे मुंबईला जाण्याची वेळ आली आहे. विनंती करूनही सरकार ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्यांचा विचार करावं, असं आवाहन सरकारला करते. 14,13,12 मागण्या मान्य केल्या, असं म्हणण्यापेक्षा सगळ्या मागण्या मान्य कराव्या. खरंच मागण्या मान्य कराव्यात, कागदावर ठेवू नका. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करा. एकदा घराच्या बाहेर पडल्यानंतर समाजाचे असतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं झालं नाही’.

Follow Us
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती