AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावात उन्हाचा तडाखा तर विदर्भात वादळी पावसाची शक्यता

देशात अनेक भागात उन्हाचा तडाखा वाढला आहे. तर काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती आहे. विदर्भात एकीकडे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला गेला असताना जळगावात मात्र उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचा अंदाज आहे.

जळगावात उन्हाचा तडाखा तर विदर्भात वादळी पावसाची शक्यता
| Updated on: May 18, 2024 | 8:33 PM
Share

विदर्भात ऐन मे महिन्यात पावसाचे सावट कायम आहे. आजपासून पुढील दोन दिवस विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात वादळी पावसाची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. मे महिन्याचा पंधरवडा लोटूनही विदर्भात उन्हाळ्याच्या तीव्रतेऐवजी सातत्याने वादळीवाऱ्यासह गारपीट अनुभवायला येत आहे. त्यामुळे शेतीचे देखील मोठे नुकसान होत आहे.

मावळमध्ये आज अनेक ठिकाणी झालेल्या वादळी पावसामुळे पॉलीहाऊस, पोल्ट्री फॉर्म आणि घरांची पडझड झालीये. तसेच रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी पावसाचा मावळमधील बेजल गावाला तडाखा बसला आहे. शेकडो एकरवरील पॉलिहाऊसची पडझड झाली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच राजपुरी येथील घरे व पोल्ट्रीं अवकाळी पावसाने पडले आहेत. मावळ कृषी अधिकारी यांनी त्वरित पंचनामे करून बळीराजाला नुकसान भरपाई देण्याची मागणी बेलज ग्रामस्थांनी शासनाला केली आहे.

जळगावात पारा 43 अंशांवर

जळगावात तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचला आहे. जळगाव जिल्ह्यात सूर्य आग ओकतो आहे. दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना तापमानापासून दिलासा मिळाला होता. आता पुन्हा तापमानाचा पारा वाढल्यामुळे आणि उष्ण लाटांमुळे जळगावचं जनजीवन प्रभावित झाले आहे.

उद्यापासून पुढचे तीन दिवस 21 मे पर्यंत तापमानाचा पारा 44 अंशावर राहणार असल्याची हवामान खात्याची माहिती आहे. नागरिकांना मेचा तडाखा आणखी काही दिवस सहन करावा लागणार आहे. उष्णता वाढल्याने नागरिक शीतपेय आणि रसवंतीच्या दुकानांवर गर्दी करत आहेत.

दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. रस्त्यांवर शुकशुकट दिसतोय. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन आहे. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, जास्तीत जास्त पाणी प्यावे असं जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आवाहन करण्यात आले आहे.

यंदा मान्सून वेळेआधी

यंदा मान्सुन वेळेच्या आधी दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदा ३१ मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून तीन दिवस आधीच कूच करत आहे. यंदा सामान्यपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Follow Us
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले…
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले….
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.