AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Andolan | सरकार अन् मराठा आंदोलकांमध्ये मध्यरात्री बैठका, अखेर मार्ग निघाला, लढ्याला यश आले

Maratha Andolan eknath shinde manoj jarange patil | राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढण्यात आले आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता नवी मुंबईत विजयी सभा घेऊन मनोज जरांगे परत जाणार आहे.

Maratha Andolan | सरकार अन् मराठा आंदोलकांमध्ये मध्यरात्री बैठका, अखेर मार्ग निघाला, लढ्याला यश आले
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 27, 2024 | 11:52 AM
Share

अभिजित पोते, मुंबई, दि.27 जानेवारी 2024 | मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांना मुंबईकडे कूच करताच सरकार कामाला लागले. मुंबईच्या वेशीत दाखल झालेल्या मनोज जरांगे यांच्या मागण्या शनिवारीच मान्य केल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले होते. परंतु मनोज जरांगे पाटील अध्यादेशावर आडून बसले होते. मग मध्यरात्री सरकार कामाला लागले. रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी दोन मंत्री जरांगे पाटील यांच्या भेटीला आले. मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्याचे मनोज जरांगे यांना सांगितले. त्यानंतर पहाटे अध्यादेश काढण्यात आला. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबईतून परत जाण्याचा निर्णय घेतला. आता नवी मुंबईत त्यांची आता विजयी सभा होणार आहे.

मध्यरात्री बैठकांचे सत्र

सरकारच्या शिष्टिमंडळांसोबत मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यरात्री बैठका सुरु होत्या. रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी सुरु झालेली बैठक तीन तासांपेक्षा अधिक काळ चालली. त्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सरकारच्या वतीने आम्ही मनोज जरांगे पाटील भेट घेतली आहे. त्यांच्या मागण्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे त्यांना देण्यात आली आहे. त्यांनी अनेक मुद्दे मांडले होते. त्याबाबत सविस्तर चर्चा मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी झाली. त्यानंतर सरकारने त्यांना उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली.

मनोज जरांगे यांनी घेतला उपोषण सोडण्याचा निर्णय

सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेली सर्व कागदपत्रे मनोज जरांगे पाटील यांनी तपासून पहिली. त्यानंतर उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावे, ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी 8 वाजता येऊन त्यांचे उपोषण सोडणार आहे.

राजकीय गुन्हे मागे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवली सराटी येथील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहे. त्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना दिले आहेत. अंतरावली सराटीमधील पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचे गुन्हे अद्याप मागे घेण्यात आले नाहीत.

हे ही वाचा…

मराठा समाजासाठी 2011 पासून आंदोलन, अखेर 2024 मध्ये यश, मनोज जरांगे 14 वर्षांचा वनवास संपला

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला