AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओबीसी, छगन भुजबळ आणि मंत्रिपद… संजय राऊतांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, थेट मोदींवर आरोप

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला यश आल्यानंतर, छगन भुजबळ यांनी या जीआर विरोधात न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना भुजबळांना कोर्टात जाण्याचा अधिकार असल्याचे म्हटले.

ओबीसी, छगन भुजबळ आणि मंत्रिपद... संजय राऊतांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, थेट मोदींवर आरोप
| Updated on: Sep 06, 2025 | 1:36 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला अखेर यश आलं. राज्य सरकारची उपसमिती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सकारात्मक बैठक झाली. या बैठकीत जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. यानंतर काही तासातच हैदराबाद गॅझेटबद्दलचा जीआर काढण्यात आला. आता यावरुन राजकारण तापलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा येऊ शकते. जर गरज पडली तर आम्ही या जीआरविरोधात येत्या चार दिवसांत न्यायालयात जाणार आहोत,” अशी ठाम भूमिका भुजबळांनी घेतली आहे. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांना कोर्टात जाऊ द्या, तो त्यांचा प्रश्न आहे, असे संजय राऊत म्हणाले.

मराठी माणसाची एकजूट निर्माण करण्याच्या भूमिकेवर ठाम

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना भुजबळ कोर्टात जाणार असल्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले. मंत्री छगन भुजबळ यांना कोर्टात जाऊ द्या, तो त्यांचा प्रश्न आहे. मराठा आणि ओबीसी हे दोन्ही महाराष्ट्राचे नागरिक असून आम्ही सर्वांना मराठी बांधव म्हणूनच पाहतो. प्रत्येकाने आपापल्या प्रश्नासाठी संघर्ष केला पाहिजे. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत. त्यामुळे आम्ही कोणत्याही जाती-धर्मात भेद न करता मराठी माणसाची एकजूट निर्माण करण्याच्या भूमिकेवर ठाम आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

देशांमध्ये जातीय आणि धार्मिक फाळणीचं स्वरूप

मराठा किंवा ओबीसी यांना आम्ही समस्त मराठी माणूस म्हणून पाहतो. प्रत्येकाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्याने आपापल्या पद्धतीने लढाई लढली पाहिजे. पण आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारे माणसं आहोत. त्यामुळे कोणत्याही जाती जातीचा उपभेद न करता मराठी माणसाची भक्कम एक्झिट उभारण्याचा भूमिकेवर आम्ही ठाम असतो. पण गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांनी महाराष्ट्रात आणि देशांमध्ये जातीचे राजकारण, धर्माचं राजकारण सुरू केलं आणि देशांमध्ये जातीय आणि धार्मिक फाळणीचं स्वरूप निर्माण केलं, असे संजय राऊतांनी म्हटले.

त्याच्यामुळे हे प्रत्यक्ष प्यादे म्हणून वापरले गेले. भुजबळ हे एक प्यादे म्हणून वापरले गेले. भुजबळांना मंत्री कोणी केलं, अजित पवारांनी केलं नाही. भुजबळांना मंत्री नरेंद्र मोदी यांनी केला. नरेंद्र मोदी यांनी मंत्री का केलं. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री जरी असले तरी ते स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून आजही समजतात. मै ओबीसी हू असं कधी कुठल्या प्रधानमंत्री ने सांगितला आहे. का माझी जात त्याच्यामुळे केवळ ओबीसी म्हणून विशेष जीआर काढून भुजबळांना मंत्रिमंडळात घ्यावा लागला. अजित पवारांना याची कल्पना नव्हती, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.