दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत अत्यंत मोठी बातमी, थेट बैठकीत…

अजित पवार यांच्या निधनानंतर मोठी खळबळ उडाली. त्यामध्येच अनेकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. त्यामध्येच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत दावा केला जात आहे. नुकताच देवगिरी बंगल्यावर महत्वाची बैठक झाली. या बैठकीत नक्की काय घडले याबाबत माहिती पुढे आली.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत अत्यंत मोठी बातमी, थेट बैठकीत...
NCP meeting
| Updated on: Feb 17, 2026 | 11:13 AM

मुंबईहून बारामतीकडे निघाले असता अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात बारामती विमानतळाच्या अगदी शेजारी झाला. सुरूवातीला अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर ते गंभीर जखमी असल्याचे सांगितले गेले. पण काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी आली. अजित पवार यांचे निधन झाल्याचे कळताच मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि पक्षाची धुरा आपल्या हाती घेतली. मात्र, यादरम्यान पवार कुटुंबातील वाद पुढे आला. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी अनेक दावे करण्यात आली. विलिनीकरण होणार होते, असे स्वत: शरद पवार यांनीही म्हटले. पण अजित पवार यांच्या निधनानंतर चर्चा थांबल्याचे त्यांनी म्हटले. शरद पवार यांना कोणतीही कल्पना न देता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांसोबत त्यांनी अगोदर चर्चा केली.

अजित पवार गटातील अनेक आमदारांनी दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण व्हावे, हे थेटपणे बोलूनही दाखवले. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी आग्रही भूमिका घेतली. आता नुकताच झालेल्या राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीमध्ये नक्की काय घडले हे सांगताना आता हिरामण खोसकर हे दिसत आहेत. विलिनीकरणाबाबत काही चर्चा झाली का? यावरही त्यांनी उत्तर दिले.

हिरामण खोसकर यांनी म्हटले की, बैठका आणि वाहतूककोडींमुळे मला बैठकीला जाण्यास उशीर झाला. मी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी भेटलो. मी बैठकीला थोडे उशिराने गेल्याने काय चर्चा झाली याबाबतची मला माहिती मिळाली नाही, पण मी तिथे गेलो. त्यांनी एकच सांगितले की, आमचा कुटुंबातील विषय आहे, पुढे काय करता येईल हे आम्ही बघू.

त्यावर त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शन केले नाही. पण लेट गेल्याने त्यांची भाषणे वगैरे सर्व अगोदरच होऊन गेले होते. मी एकटाच लेट गेल्याने मी तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि वहिणी आणि पार्थ पवार यांना भेटलो. त्यांनी सांगितले की, आमची काही चर्चा झालेली आहे, पण मला काही माहिती मिळाली नाही. मी लेट गेल्याने मला विलिनीकरणाबाबत माहिती मिळाली नाही. काही आमदारांसोबतही माझी चर्चा झाली नसल्याचे त्यांनी म्हटले. तो कुटुंबाचा विषय आहे आणि आपण कोणी बोलणे योग्य नाही, असेही हिरामण खोसकर यांनी म्हटले.