AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनचे सरकारकडे कसलेच नियोजन नाही, मनसेची टीका

राज्य सरकारकडे कसलेच नियोजन आणि धोरण दिसत नाही, अशी टीका राजू पाटील यांनी ट्विटद्वारे केली. (MNS Raju Patil Comment on Lockdown Exit plan)

लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनचे सरकारकडे कसलेच नियोजन नाही, मनसेची टीका
| Updated on: Jun 08, 2020 | 3:20 PM
Share

कल्याण : राज्य सरकारच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यात काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यभरात लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता देण्यात आल्यामुळे मुंबईत बेस्ट बस सुरु झाल्या आहेत. तर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली. तर मरिन ड्राईव्ह आणि चौपट्यांवर गर्दी होतानाचं चित्र आज ठिकठिकाणी पाहायला मिळालं. यावरुन राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनवर मनसे आमदार राजू पाटील टीका केली आहे.

लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत राज्य सरकारकडे कसलेच नियोजन आणि धोरण दिसत नाही, अशी टीका राजू पाटील यांनी ट्विटद्वारे केली. (MNS Raju Patil Comment on Lockdown Exit plan)

“तुमचा #lockdown_exit_plan काय ?” असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्य सरकारला विचारला होता. सरकारकडे या प्रश्नाचं तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आजही नाही. लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिलं आहे. कसलेच नियोजन आणि धोरण दिसत नाही,” असे ट्विट मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे.

या ट्विटसोबत त्यांना मरिन ड्राईव्ह, रस्त्यावरील ट्राफिक आणि अनेक लोकांच्या रांगा लागलेले फोटो ट्विट केले आहेत.

लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय, राज ठाकरेंचा सवाल

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान राज ठाकरे यांनी लॉकडाऊन संपेल, तेव्हा त्याचा एक्झिट प्लॅन काय? असा प्रश्न विचारला होता.

लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय? जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत तुम्ही लॉकडाऊन ठेवू शकत नाही. तो आयत्यावेळी सांगून उपयोग नाही, त्याची आधी कल्पना द्यावी. तो कसा काढणार, काय सुरु होईल, काय बंद होईल, ते लोकांना सांगावं. लॉकडाऊन बंद केला, त्यामुळे संध्याकाळच्या फ्लाईटने कोरोना जाणार नाही. लस येईपर्यंत कोरोना जाऊ शकत नाही, असे राज ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले  होते. (MNS Raju Patil Comment on Lockdown Exit plan)

संबंधित बातम्या : 

लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे यांच्याकडून सरकारला 9 सूचना

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.