AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई त्याला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायची आहे, तोच फोन ठरला शेवटचा, काही तासातच तरुणीचा मृत्यू, मैत्रिणीने थेट..

नुकताच एक मोठी माहिती पुढे आली, ज्यानंतर एकच खळबळ उडाली. मुलीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी गोळ्या दिल्या आणि त्यानंतर काही तासातच तिचा जीव गेला, असा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

आई त्याला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायची आहे, तोच फोन ठरला शेवटचा, काही तासातच तरुणीचा मृत्यू, मैत्रिणीने थेट..
Baramati incident
| Updated on: Aug 11, 2026 | 2:33 PM
Share

पुण्यात घडलेल्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. प्रियकर आणि होणाऱ्या नवऱ्याकडून दिल्या जाणाऱ्या गोळ्यामुळे चक्क 23 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय. एका 23 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला. या मुलीने अगोदर आपल्या आईला फोन केला आणि काही तासातच तिचा मृत्यू झाला. आईला फोन करून तिने सांगितले की, अथर्व त्याच्या घरी मला घेऊन जात आहे आणि गोळी खाण्यास देणार आहे, त्याला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायची आहेत. मुलीचे हे शब्द ऐकताच आईने मुलीला ताबडतोब घरी येण्यास सांगितले. ज्यावेळी मुलगी हे सर्व आईला सांगत होती, त्यावेळी ती अथर्व याच्याच गाडीत होती. आईने मुलीला सांगितले की, तिकडे न जाता आपल्या घरी ये. मात्र, त्यानंतर काही वेळातच मुलीच्या मृत्यूची बातमी आली.

6 ऑगस्ट रोजी मुलगी अथर्व याच्यासोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती. काही दिवसांपासून मुलगी शांत शांत राहत असल्याचेही तिच्या आईच्या लक्षात आले होते. हेच नाही तर अथर्व याच्याकडून मुलीला गोळ्या दिल्या जात असल्याची माहिती मुलीच्या आईला तिच्या मैत्रिणीने दिली. मुलगी 10 ते 12 दिवसांपासून शांत राहत असल्याचे आईच्या लक्षात आल्यानंतर आईने मुलीच्या मैत्रिणींना याबाबत विचारले, यावर मैत्रिनींनी सांगितले की, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी अथर्व तिला आग्रह धरत आहे.

त्यानंतर अथर्व तिला घेऊन बारामतीच्या कॉलेजमध्ये गेला. त्यानंतर मुलीने अथर्वच्या घरी जात असल्याचे आईला सांगितले तो शारीरिक संबंध ठेवण्याचे बोलत आहे. यानंतर आईने मुलीला दोन वेळा फोन केला पण तिने उचलला नाही. आईने अथर्वच्या मोबाईलवर फोन केला तर तिच्या मुलीशी बोलणे झाले. या प्रकरणात मुलीच्या आईने आरोप करत अथर्व मेहन वय 27 विरोधात गुन्हा दाखल केला. मुलीचे आणि अथर्व यांचे प्रेमसंबंध होते, दोघांच्या कुटुंबियांच्या सहमतीने लग्न ठरवले होते.

अथर्व आणि मुलगी एकमेकांच्या संपर्कात होते आणि फोनवरून नियमित संपर्कात होते. मात्र, अथर्व याच्याकडून आपल्या मुलीला गोळ्या दिल्या जात आहेत, याबद्दल काही दिवसांपूर्वीच मुलीच्या आईला कल्पना आली. बारामती शहर पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं. 325/2026, भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 106(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीने अथर्वकडून दिल्या जाणाऱ्या गोळ्या खाण्यास नकार देण्यात आला. याच गोळ्यामुळे मुलीची प्रकृती बिघडल्याचा आरोप मुलीच्या आईकडून करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?