AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आम्ही ठरवू अमित शाह देशात राहातील की देशाच्या तुरुंगात’, संजय राऊतांची चौफेर फटकेबाजी

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, या कार्यक्रमामध्ये बोलताना संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला.

'आम्ही ठरवू अमित शाह देशात राहातील की देशाच्या तुरुंगात', संजय राऊतांची चौफेर फटकेबाजी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 19, 2025 | 7:53 PM
Share

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, या कार्यक्रमामध्ये बोलताना संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘आपण चिडलं पाहिजे. आपल्याला संताप आला पाहिजे. निवडणूक आयोग किंवा अमित शाह ठरवणार नाहीत की शिवसेना कुणाची आहे? उद्या आम्ही ठरवू अमित शाह हे देशात राहातील की देशाच्या तुरुंगात राहातील असा घणाघात यावेळी राऊत यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले राऊत? 

संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. असंख्य संकटं आली, गेल्या 60 वर्षांमध्ये शिवसेनाप्रमुखांसमोर त्यांनी घडवलेली माणसं सोडून गेली. उद्धव ठाकरेंनी मोठी पदे दिली ते सोडून गेले. बाळासाहेब असतील, उद्धवजी असतील मी नेहमी सांगतो, आपण माकडांची माणसं केली. ठाकरेंनी माकडांची माणसं केली. त्या माणसांना सरदारही आपणच केलं. त्या सरदारांनी आपल्या पाठीत घाव घातला, हे आम्ही सातत्याने पाहतो. एवढ्या हल्ल्यानंतर शिवसेना झुकली नाही, वाकली नाही. या भूतलावर ५६ इंच छातीवाले लोक आहेत, पण एक ट्रम्पचा फोन येतो आणि सरेंडर होतात. आमच्या नेत्यालाही अनेक फोन आणि दबाव आले. पण आम्ही झुकलो नाही. सरेंडर होण्याचं काम नरेंद्र आणि देवेंद्र यांचं आहे. आमचं नाही. या देशात काय चाललंय? असा सवाल यावेळी राऊत यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणले की, काश्मीर या देशाचं महत्त्वाचं अंग आहे. राज्यातील अनेक पर्यटक पहलगाममध्ये जातात. तिथे चार अज्ञात लोक बंदूक घेऊन येतात आणि धर्म विचारून आमच्या माय भगिनीवरच्या माथ्यावरचं कुंकू पुसतात. देशात हाहाकार माजतो. दोन महिने हल्ल्याला झाले तरी चार अतिरेक्यांचा शोध ५६ इंचाचं सरकार घेऊ शकले नाही. कुठे गेले ते अतिरेकी. तुम्ही पाकिस्तानवर बॉम्ब टाकला, मिसाईल टाकली पण प्रश्न अजून आहे. ज्या अतिरेक्यांनी माय भगिनींचे कुंकू पुसलं ते अतिरेकी कुठे गेले. आकाशात गेले, पाताळात गेले की जमिनीत गेले. गृहमंत्र्यांना त्यांचा शोध घेता आला नाही, असा निशाणा राऊत यांनी साधला आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत