AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : रोज टीका करणाऱ्या राऊतांनी फडणवीसांबाबतची एक गोष्ट प्रामाणिकपणे केली मान्य

Sanjay Raut : संजय राऊत हे दररोज सत्ताधाऱ्यांवर तुटून पडतात. खासकरुन भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते जोरदार टीका करतात. पण आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची एक गोष्ट प्रामाणिकपणे मान्य केली.

Sanjay Raut : रोज टीका करणाऱ्या राऊतांनी फडणवीसांबाबतची एक गोष्ट प्रामाणिकपणे केली मान्य
sanjay raut devendra fadnavis
| Updated on: Mar 25, 2025 | 8:31 AM
Share

“2014 साली भाजपचे वरिष्ठ नेते त्यांचा युती तोडायचा कार्यक्रम घेऊन आलेले, हे त्यांचं ठरलेलं. चर्चा सुरु होती. माननीय बाळासाहेब ठाकरे त्यावेळी हयात नव्हते. याचा फायदा घ्यावा आणि या निमित्ताने शिवसेनेला आपण संपवाव हे त्यांचं एक धोरण, योजना होती. हिंदुत्ववादी दाखवत असले तर फरमान घेऊन त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीतून इथे आलेले. आकडा सोडून द्या, भाजपा पोस्टर लावायला महाराष्ट्रात माणस नव्हती, तेव्हा आम्ही भाजपाला खाद्यावर घेऊन गावागावात फिरवलं” असं खासदार संजय राऊत म्हणाले. “पार्ल्यात पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या विजयानंतर भाजपला साक्षात्कर झाला, महाराष्ट्रात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे आपल्या सोबत असतील, तरच या देशात आपण हिंदुत्वाचा प्रखर प्रचार करु शकतो” असं संजय राऊत म्हणाले.

“बाळासाहेबांनी सांगितलं, हिंदुत्वाच्या नावावर मतांची विभागणी नको. बाबरी प्रकरणानंतर संपूर्ण देशात लढणार होतो. शिवसेनाप्रमुखांच्या नावाची लाट निर्माण झालेली. उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात अशा हिंदू भाषिक पट्टयात 60 ते 65 जागा लढायच नक्की होतं. तेव्हा लोकसभेला 40 जागा निवडून येतील, याची खात्री होती. आमची तयारी सुरु असताना हे जेव्हा जाहीर केलं, तेव्हा भाजपचे धाबे दणाणले. अटलजींचा बाळासाहेबांना फोन आला. अटलजींनी बाळासाहेबांना सांगितलं, तुम्ही देशात निवडणुका लढत आहात, त्याने भाजपच नुकसान होईल. हिंदुत्ववादी मत विखुरली जातील. भाजपाचा पराभव आणि काँग्रेसचा फायदा होईल, मी विनंती करतो उमेदवार मागे घ्या. त्यावेळी बाळासाहेबांनी सांगितलं राज्यबाहेर लढत आहोत उमेदवार मागे घ्या, नाहीतर राष्ट्रीय स्तरावर आम्हीच होतो” असा दावा संजय राऊत यांनी केला.

‘एका-एकाजागेवर 72-72 तास चर्चा’

“पण २०१४ साली एका-एकाजागेवर 72-72 तास चर्चा चालली होती. मी तेव्हा होतो, ओम माथुर प्रभारी होते. आम्ही हा खेळ पाहत होतो. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीत शिवसेना-भाजप युती तुटू नये या मताचे होते. हे मी प्रामाणिकपणे सांगेन. त्यावेळी युती करण्यासदंर्भात त्यांची भूमिका सकारात्मक होती. पण भाजपच वरुन ठरलेलं असल्यामुळे युती तुटली” असं संजय राऊत म्हणाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.