AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहिण योजनेमुळे वृद्ध कलाकारांना मानधन मिळालेलं नाही, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut : चीन, कॅनडा यांनी अमेरिकेविरोधात टॅरिफ वॉर लढण्याचा निर्णय घेतलाय, पण भारत अजून गप्प आहे, या प्रश्नावर राऊत यांनी "याला देश बोलतात, 56 इंचाची छाती बोलतात" असं उत्तर दिलं.

लाडकी बहिण योजनेमुळे वृद्ध कलाकारांना मानधन मिळालेलं नाही, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 08, 2025 | 11:45 AM
Share

“आज जागतिक महिला दिन आहे. पण महाराष्ट्राची गेल्या काही महिन्यातली अवस्था पाहिली, तर महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचार देशात सर्वाधिक आहेत. मंत्री त्यात सामील आहेत. सरकारी पक्षाचे लोक सामील आहे. पोलिसांवर दबाव आहे. लाडकी बहिण योजनेसारख्या माध्यमातून 1500 रुपये तुम्हाला दिले म्हणजे महिला सुरक्षित आहेत आणि आम्ही महिलांचे हितरक्षक आहोत. या भूमिकेत जर सरकार असेल तर ते सरकार समस्त महाराष्ट्र आणि महिलावर्गाची फसवणूक करत आहेत” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. “लाडकी बहिण योजना किती फसवी आहे ते आपण निवडणुकीनंतर पाहिलं. निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार होते. आता संबंधित खात्याच्या मंत्री महिला आहेत, त्यांनी ते शक्य नाही सांगितलं, ही महिलांची फसवणूक आहे” असं संजय राऊत म्हणाले.

“मला काल काही वुद्ध कलाकार भेटले. त्यांना दर महिन्याला सरकारकडून काही मानधन मिळतं. त्यांनी मला सांगितलं की, लाडकी बहिण योजना आल्यापासून वुद्ध कलाकारांना त्यांचं मानधन मिळालं नाही. ही आर्थिक अवस्था या राज्याची आहे. आर्थिक पाहणी अहवाल आलाय, त्यावरच बोट दाखवलय. हे राज्य कर्जाच्या ओझ्याखाली चिरडतय. या राज्यामध्ये आर्थिक अराजक माजलं आहे. वृद्ध कलाकार काल माझ्याकडे अक्षरक्ष: रडत होते” असं संजय राऊत म्हणाले.

‘याला देश बोलतात’

“या सरकाने महिलांना 2100 रुपये द्यायचं कबूल केलं आणि आता द्यायला तयार नाही. या योजनेतून पाच लाख महिलांची नाव कापली गेली, मग योजना फसवी नाही का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. चीन, कॅनडा यांनी अमेरिकेविरोधात टॅरिफ वॉर लढण्याचा निर्णय घेतलाय, पण भारत अजून गप्प आहे, या प्रश्नावर राऊत यांनी “याला देश बोलतात, 56 इंचाची छाती बोलतात. युक्रेनच्या जेलेंस्कीसह काही देशांनी ट्रम्पसोबत संघर्ष सुरु केलाय आणि आपण गप्प बसलोय” असं म्हणाले.

16 लाख कोटी कागदावर

मुख्यमंत्र्यांनी काल 16 लाख कोटीची गुंतवणूक आणली असं सांगितलं, त्यावर संजय राऊत म्हणाले की, “16 लाख कोटी देशात कधी येतात, ते पहाव लागेल. 16 लाख कोटी कागदावर आहेत. हे मोठमोठ आकडे देतात. कृषी क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे, त्याचं श्रेय सरकारने घेऊ नये किंवा कृषी मंत्रालयाने घेऊ नये, याचं श्रेय शेतकऱ्यांच आहे”

अजय अशर फॉर्म्युल्यामुळे आपण मागे

“उद्योग-सेवा क्षेत्रात महाराष्ट्र पिछाडीवर आहे, याच कारण की, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर महाराष्ट्रतील उद्योग परराज्यात गेले. दुसरं अजय अशरसारखे लोक उद्योग-सेवा क्षेत्रात मागे पडण्याचं एक कारण आहे. मुख्यमंत्र्यांचे हस्तक म्हणून काम करत होते. त्यांनी काय केलं? कशी लूट केली? अजय अशर फॉर्म्युल्यामुळे आपण उद्योग-सेवा क्षेत्रात मागे राहिलो” असं संजय राऊत म्हणाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.