AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकेरी भाषेत बोलतात तुमची लायकी काय रे…उदयनराजे भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर काय म्हणाले..

शिवाजी महाराज यांनी सगळ्यांना घेऊन काम केलं, आता फक्त मी-मी सुरू झालं आहे, स्वतःचं व्यक्तिमत्व मोठं करण्यासाठी दुसऱ्याला नाव ठेवतात, यांची लायकी नाही असे म्हणत इशाराही दिला आहे.

एकेरी भाषेत बोलतात तुमची लायकी काय रे...उदयनराजे भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर काय म्हणाले..
Image Credit source: Google
| Updated on: Feb 12, 2023 | 2:06 PM
Share

नाशिक : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Bhagatsinh koshyari ) यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर रमेश बैस ( Ramesh Bais ) यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यावर खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosle )  यांनी चांगलीच आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे यांनी थेट हल्लाबोल करत नव्या राज्यपालांकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहे. राष्ट्रपती जसे देशाचे प्रमुख असतात तसे राज्याचे राज्यपाल राज्याचे प्रमुख असतात त्यामुळे त्यांनी जपून बोललं पाहिजे, त्यांच्या विधानाकडे सर्वांचे लक्ष लागून असते. त्यांच्या विधानामुळे जातीजातीत वाद होऊ शकतात असेही उदयनराजे यांनी म्हंटलं आहे.

पुढे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, शिवाजी महाराज यांनी युद्ध केलं ते जनतेला न्याय मिळून देण्यासाठी केला आहे, जे आपण करू शकत नाही.

ज्यांची ऊंची नाही ते अशी विधाने करतात, अशी मोठी विकृती आपल्याला पाहायला मिळते, त्यांची व्याप्ती संकुचित आहे, अलीकडच्या काळात काही लोकांमध्ये अहंकार निर्माण झाला आहे.

शिवाजी महाराज यांनी सगळ्यांना घेऊन काम केलं, आता फक्त मी-मी सुरू झालं आहे, स्वतःचं व्यक्तिमत्व मोठं करण्यासाठी दुसऱ्याला नाव ठेवतात, यांची लायकी नाही असे म्हणत इशाराही दिला आहे.

ते एक भगतसिंग होते, पण हे एक भगतसिंग आहे. त्यांच्या वडिलांनी त्यांचे नामकरण केलं त्यांना काय बोलणार आता, एकेरी भाषेत बोलतात तुमची लायकी काय रे, त्यांनी जे केलं तिथं आपण पोहचू शकत नाही असा थेट हल्लाबोल उदयनराजे यांनी केला आहे.

सोईप्रमाणे सगळं केलं जातं आहे, मतं मिळविण्यासाठी सगळं चालल आहे, व्यापीठावर शिवाजी महाराज यांचा फोटो ठेवला जातो, हार घालतात आणि मत मागतात असेही उदयनराजे यांनी म्हंटलं आहे.

शिवाजी महाराज यांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे, पुढील काळात कुणी काहीही चुकीचम बोललं तर आम्ही असं काहीही खपून घेणार नाही, कुणाकडे व्यक्त व्हायचे हाणून त्यावेळी रायगडावर गेलो.

महाराजांचा विचार सोडला तर देशाचे किती तुकडे होतील, भारताचा युनायटेड स्टेट इंडिया होऊन जाईल असे मतही उदयनराजे यांनी व्यक्त करत जातीपातीच्या पलीकडे जाऊन मी काम करतो असे म्हंटले आहे.

सगळ्यांनी मर्यादा ठेऊन बोललं पाहिजे, वास्तविक उशीर झाला आहे, मला लोकं विचारायचे मी तेव्हाच सांगितलं की आता काय करू ? पण आता निर्णय झाला आहे.

वेळेत निर्णय घेतला तर बरेच काही सावरता येतं, आपल्याकडे एक महान आहे, उशिरा मिळालेला न्याय हा एक प्रकारे अन्याय असतो, मी व्यक्तिदोष करत नाही माझा विरोध विचारांचा होता असेही उदयनराजे भोसले यांनी म्हंटलं आहे.

कोश्यारीचं वय पाहता त्यांच्याकडून असं अपेक्षित नव्हतं, निवृत्तीचं वय नोकरीला लागू करतात, तसं राजकारणात वयाचे बंधन लावावे. तरुण पणातच काही जबाबदाऱ्याच दिल्या पाहिजे, जास्त वय असलेले लोकं नसायला पाहिजे

नवे राज्यपाल रमेश बैस यांचे मी स्वागत करतो. आम्ही सर्व सहकार्य करू त्यांनी महापुरुषांच्या बाबतीत विचार संपूर्ण देशात पोहचवावा अशी अपेक्षाही उदयनराजे यांनी व्यक्त केली आहे.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.