AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज Pratap Sarnaik ची प्रॉपर्टी अटॅच केली, नंतर त्यालाही अटॅच-अटक होणार, Kirit सोमय्यांचा इशारा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई हा शिवसेनेला दुसरा मोठा धक्का बसला आहे.

आज Pratap Sarnaik ची प्रॉपर्टी अटॅच केली, नंतर त्यालाही अटॅच-अटक होणार, Kirit सोमय्यांचा इशारा!
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा इशारा Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 25, 2022 | 2:30 PM
Share

मुंबईः NACL घोटाळ्याप्रकरणी शिवसेना आमदार  प्रताप सरनाईक यांच्या 11 कोटी 35 लाख रुपयांच्या प्रॉपर्टीवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. उद्या प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनाही अटक होऊ शकते, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी दिला आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या मालमत्तेवर काही वेळापूर्वीच ईडीने (ED) कारवाई केली आहे. 2013 मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर प्रताप सरनाईक यांना अनेकदा समन्स बजावण्यात आले होते. त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे आता ईडीने ही कारवाई केल्याचे समजते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई हा शिवसेनेला दुसरा मोठा धक्का बसला आहे.

नंतर यालाही अटक करणार…

प्रताप सरनाईक यांची 11.35 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली, याविषयी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, ‘ एनएसीएल कंपनीच्या घोटाळ्यात प्रताप सरनाईक आणि त्यांचे पार्टनर यांनी 216 कोटी रुपये ढापले होते. 35 कोटी सरनाईकांच्या बँक खात्यात आले होते. या पैशांत त्यांनी टिटवाळ्याची जमीन घेतली होती. आज ईडीने त्यांची पुढची कारवाई केली आहे. साडे अकरा कोटींची प्रॉपर्टी अटॅच झाली आहे. ही कारवाई इथेच थांबणार नाही. उद्धव ठाकरेंनी त्यांचे कितीही गुन्हे माफ केले तरी किरीट सोमय्या थांबणार नाही. एनएसीएलची जनहितयाचिका मी 2013 मध्ये दाखल केली होती. 5,600 कोटींचा घोटाळा करुन गुंतवणूकदारांना लुटलं होतं. आज प्रॉपर्टी अटॅच केली आहे, पुढे केव्हातरी प्रताप सरनाईकलाही अटक केली जाणार.

मीच जनहितयाचिका दाखल केली होती..

किरीट सोमय्या पुढे म्हणाले, ‘ आर्थिक गुन्हे शाखेने 2013 मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 5, 600 कोटी रुपयांचा टर्नओव्हर असणाऱ्या 13 हजार गुंतवणूकदार असलेल्या कंपनीचा घोटाळा झाला आहे, असा आरोप केला जात आहे. चुकीच्या पद्धतीनं पैसे वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवण्यात आले आहेत. याप्रकरणी ईडीने पीएमएल कायद्याअंतर्गत मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 25 डिफॉल्टर ईडीने शोधले होते. त्यांच्यावर कारवाई होत आहे. त्यापैकीच ही एक कारवाई आहे, अशी प्रतिक्रिया किरटीट सोमय्या यांनी दिली.

इतर बातम्या-

आमदारांना मोफत घरे नाहीच, आमदारांना कितीला पडणार घर?; Jitendra Awhad यांनी सांगितली किंमत

Lock Upp Show : कंगना रनौत ‘लॉकअप’ बाहेर…, मुंबई विमानतळावर स्पॉट, पाहा फोटो…

Follow Us
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....