AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हल्ला आमच्यावर अन् अटक पण आमच्याच कार्यकर्त्यांना हा तर अन्याय; मनोज जरांगे पाटील संतापले

Manoj Jarange Patil on Anatarwali Sarati Attack Aropi Arrest : सरकारने आरोपींना कसं काय पकडलं?; अंतरवली सराटी गावातील हल्ला प्रकरणातील कारवाईवर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया. त्यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. तसंच कारवाईवरही भाष्य केलंय. पाहा...

हल्ला आमच्यावर अन् अटक पण आमच्याच कार्यकर्त्यांना हा तर अन्याय; मनोज जरांगे पाटील संतापले
| Updated on: Nov 25, 2023 | 9:41 AM
Share

मुंबई | 25 नोव्हेंबर 2023 : अंतरवली सराटी दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने सांगितलं होतं की, आम्ही कोणालाही अटक करणार नाही. आमचे लोक अटक करून सरकारला आम्हाला बदनाम करायचं आहे. त्यांनी आमच्या विरोधात बोलणे बंद करावं. आम्ही सुद्धा त्यांच्या विरोधात बोलणार नाही. सगळ्या महाराष्ट्रातील कार्यकर्ते आमचे आहेत. पूर्ण माहिती घेऊन त्यानंतर त्यावर बोलेन. सरकारने सांगतिले होते अटक करणार नाही म्हणून तुम्ही अटक करून आमच्या आंदोलनाला डाग लावणार आहेत का?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. या प्रकरणात सरकारने आरोपींना कसं काय पकडलं?, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे.

‘त्या’ आरोपींना अटक

अंतरवली सराटी दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेने ही अटक केली आहे. काल सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास ही अटक केली. अंबड पोलीस ठाण्याच्या लोकअपमध्ये आरोपींचा मुक्काम आहे. अंबड पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. आज सकाळी 11 वाजता अंबड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

जरांगे पाटील यांचा सवाल

सरकारने आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अटक करू नये. सरकारने गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आता आमच्या लोकांना अटक का केली जात आहे?, असं सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. अजित पवार म्हणतात तसंच आम्हीही म्हणतो. पोलिसांनी दबावाला बळी पडूच नये. पोलीस प्रशासनाने त्यांचं काम केलंच पाहिजे पण निष्पाप लोकांवरही अन्याय होऊ नये, याकडेही त्यांनी लक्ष द्यावं, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

अजित पवार म्हणाले…

अंतरवली सराटी हल्ला प्रकरणात पोलिसांनी दबावाला बळी न पडता कारवाई करावी. तपासातून वस्तुस्थिती समोर येईल आणि ज्यांच्या चूक असतील, त्यांना कडक शासन होईल, असं अजित पवार म्हणालेत.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.