AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरंडेश्वर कारखाना प्रकरणात क्लीन चीट मिळाली की नाही? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं, प्रतिक्रिया काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना क्लीन चिट मिळाल्याची चर्चा सुरू असताना त्यांनी त्यावर अजित पवार यांनी भाष्य केले आहे. याशिवाय काँग्रेस नेत्याच्या भूमिकेवरूनही नाराजी व्यक्त केली आहे.

जरंडेश्वर कारखाना प्रकरणात क्लीन चीट मिळाली की नाही? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं, प्रतिक्रिया काय?
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Apr 12, 2023 | 2:03 PM
Share

मुंबई : जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संदर्भात विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात ईडीच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरू आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या कुटुंबासह त्यांच्या नातलगांची चौकशी केली होती. या संदर्भात अजित पवारांना एकदाही ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं नाही. त्यासाठी पाठविण्यात येणारे समन्सही दिले गेले नाही. त्यावरून अजित पवार यांना ईडीने क्लीन चिट दिलीय का? अशी चर्चा सुरू झाली होती. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही ट्विट करून अजित पवार हे भाजपच्यासोबत जाणार असल्याचे म्हंटलं होतं.

सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या संदर्भात बोलत असताना अजित पवार हे भाजपसोबत 15 ते 20 आमदारांना घेऊन जाणार असल्याची माहिती दिली होती त्यानंतरच अजित पवार यांना जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संदर्भात क्लीन चिट दिल्याची चर्चा सुरू झाली होती.

त्यावर अजित पवार यांनी म्हंटलंय, ईडी कडून चौकशी चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे क्लीन-चिट मिळालेली नाहीये. ती बातमी कशाला अनुसरून दिली मला काही कळायला मार्ग नाही. पण मी आज स्पष्टपणे सांगू इच्छितो की अशा प्रकारची क्लीन चीट मिळालेली नाही.

अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह त्यांच्या बहिणींच्या घरी इडी कडून काही दिवसांपूर्वी छापेमारी झाली होती. जरंडेश्वर साखर कारखान्यातही ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. त्यानंतर अनेक नेत्यांना ईडी कडून समन्स बजावण्यात आले त्यांची चौकशी करण्यात आली.

मात्र ,अजित पवारांना कुठलेही समन्स आले नाहीत. त्यावरून उलट सुलट चर्चा सुरू झाली. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी अजित पवार पंधरा आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला त्यावरून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्यासाह पंधरा आमदार हे अपात्र होतील असेही अंजली दामनिया यांनी म्हंटलं होतं.

याशिवाय अजित पवार यांनी महाविकास आघाडी जर टिकवायची असेल तर बैठकीत बोलले पाहिजे, मीडिया समोर बोलण्याची गरज नाही. आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे वारंवार तसं करत असल्याचे सांगत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावरून महाविकास आघाडीत नाना पटोले यांची भूमिका अजित पवार यांना पटत नाही का? असेही बोलले जात आहे.

Follow Us
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं
अमरावती आश्रमशाळा वसतीगृहात 48 ऐवजी 110 मुली एका खोलीत
अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु
सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला,आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर
नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी