AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात मोगलाई सुरू, संजय राऊत कडाडले; नितीन देशमुख यांच्या अटकेवरुन सरकारवर घणाघात

आमदार नितीन देशमुख यांच्या अटकेवरुन संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत खारघर प्रकरणावरुन सरकारवर गंभीर आरोप केले आहे.

महाराष्ट्रात मोगलाई सुरू, संजय राऊत कडाडले; नितीन देशमुख यांच्या अटकेवरुन सरकारवर घणाघात
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Apr 20, 2023 | 10:32 AM
Share

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमदार नितीन देशमुख यांच्या अटकेवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. नितीन देशमुख हे पाणी यात्रा काढून पाण्याच्या संदर्भात मागणी करत असतांना त्यांना नितीन देशमुख यांना अटक केली ही मोगलाई आहे. महाराष्ट्रात औरंगजेबाचे सरकार आहे का? देवेंद्र फडणवीस यांना माणुसकी राहिली नाही का? असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलत असतांना नितीन देशमुख देशमुख यांच्यावर पोलिसांनी हल्ला करून अज्ञानस्थळी लपविल्याचा आरोप केला आहे. नितीन देशमुख हे पाण्याचे नमुने घेऊन दाखवला येत होते यामध्ये कुठला कायदा सुवस्थेचा प्रश्न होता? असा सवाल ही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

नितीन देशमुख हे त्यांच्या मतदार संघात पाणी येतंय ते खारं पाणी आहे. ते पाणी लहान मुलांना प्यायला द्यायचं का? त्याचसाठी नितीन देशमुख हे पायी यात्रा काढत होते. देवेंद्र फडणवीस यांना त्या पाण्याचे नमुने दाखविणार होते. मात्र, त्यावर आवाज उठवला तर त्यांना अटक केली? ही काय मोगलाई सुरू आहे का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस यांनी मानसुकी दाखवला पाहिजे होते. उलट त्यांच्या पोलिसांनी नितीन देशमुख यांना अटक करून त्यांना अज्ञात स्थळी लपवून ठेवले आहे. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी यावेळी सरकार हे औरंगजेबाचे सरकार आहे का? असाही सवाल उपस्थित केला.

या दरम्यान संजय राऊत यांनी खारघर प्रकरणावरुन सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. साधू हत्या प्रकरणावेळी छाती बडवणारे आता कुठे गेले ? म्हणत सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला बुच लावलं आहे का? ते बोलत का नाही ? असाही सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री निर्घृण आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही. पण देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा डोळ्यात माणुसकी दिसली नाही. भाजपच्या लोकांनी डहाणू मध्ये साधू हत्या प्रकरणावरुन दंगल घडविण्याचा प्रयत्न केला होता. ते कुठे गेले आता? असाही सवाल उपस्थित केला आहे.

खारघर प्रकरणात पन्नास जणांचा पाण्यावाचून मृत्यू झाला आहे. अजूनही मृत्यूचे आकडे लपविले जात आहे. काही जणं घरी जातांना मृत्यूमुखी पडले. लोकं मला भेटायला आल्यावर सांगत आहे. पैसे देऊन आवाज दाबला जात आहे. श्री सदस्यांच्या मृत्यूवर भाजप का बोलत नाही? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.