AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात मोगलाई सुरू, संजय राऊत कडाडले; नितीन देशमुख यांच्या अटकेवरुन सरकारवर घणाघात

आमदार नितीन देशमुख यांच्या अटकेवरुन संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत खारघर प्रकरणावरुन सरकारवर गंभीर आरोप केले आहे.

महाराष्ट्रात मोगलाई सुरू, संजय राऊत कडाडले; नितीन देशमुख यांच्या अटकेवरुन सरकारवर घणाघात
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Apr 20, 2023 | 10:32 AM
Share

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमदार नितीन देशमुख यांच्या अटकेवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. नितीन देशमुख हे पाणी यात्रा काढून पाण्याच्या संदर्भात मागणी करत असतांना त्यांना नितीन देशमुख यांना अटक केली ही मोगलाई आहे. महाराष्ट्रात औरंगजेबाचे सरकार आहे का? देवेंद्र फडणवीस यांना माणुसकी राहिली नाही का? असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलत असतांना नितीन देशमुख देशमुख यांच्यावर पोलिसांनी हल्ला करून अज्ञानस्थळी लपविल्याचा आरोप केला आहे. नितीन देशमुख हे पाण्याचे नमुने घेऊन दाखवला येत होते यामध्ये कुठला कायदा सुवस्थेचा प्रश्न होता? असा सवाल ही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

नितीन देशमुख हे त्यांच्या मतदार संघात पाणी येतंय ते खारं पाणी आहे. ते पाणी लहान मुलांना प्यायला द्यायचं का? त्याचसाठी नितीन देशमुख हे पायी यात्रा काढत होते. देवेंद्र फडणवीस यांना त्या पाण्याचे नमुने दाखविणार होते. मात्र, त्यावर आवाज उठवला तर त्यांना अटक केली? ही काय मोगलाई सुरू आहे का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस यांनी मानसुकी दाखवला पाहिजे होते. उलट त्यांच्या पोलिसांनी नितीन देशमुख यांना अटक करून त्यांना अज्ञात स्थळी लपवून ठेवले आहे. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी यावेळी सरकार हे औरंगजेबाचे सरकार आहे का? असाही सवाल उपस्थित केला.

या दरम्यान संजय राऊत यांनी खारघर प्रकरणावरुन सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. साधू हत्या प्रकरणावेळी छाती बडवणारे आता कुठे गेले ? म्हणत सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला बुच लावलं आहे का? ते बोलत का नाही ? असाही सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री निर्घृण आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही. पण देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा डोळ्यात माणुसकी दिसली नाही. भाजपच्या लोकांनी डहाणू मध्ये साधू हत्या प्रकरणावरुन दंगल घडविण्याचा प्रयत्न केला होता. ते कुठे गेले आता? असाही सवाल उपस्थित केला आहे.

खारघर प्रकरणात पन्नास जणांचा पाण्यावाचून मृत्यू झाला आहे. अजूनही मृत्यूचे आकडे लपविले जात आहे. काही जणं घरी जातांना मृत्यूमुखी पडले. लोकं मला भेटायला आल्यावर सांगत आहे. पैसे देऊन आवाज दाबला जात आहे. श्री सदस्यांच्या मृत्यूवर भाजप का बोलत नाही? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Follow Us
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट.
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात...
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात....
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा...
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा....
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला.
मोठी बातमी! शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी एक नाव जवळपास निश्चित, मात्र..
मोठी बातमी! शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी एक नाव जवळपास निश्चित, मात्र...
थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र
थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र.
मतदारांवर दबाव आणण्यासाठी... बंगाल निवडणुकीबाबत राऊतांचं मोठं विधान
मतदारांवर दबाव आणण्यासाठी... बंगाल निवडणुकीबाबत राऊतांचं मोठं विधान.
विदर्भ होरपळला; अमरावतीत 46°C, सात वर्षांचा विक्रम मोडला
विदर्भ होरपळला; अमरावतीत 46°C, सात वर्षांचा विक्रम मोडला.
मराठी सक्तीवरून मुंबईत राजकारण तापलं; मुंडेंचा मराठी माणसालाच इशारा?
मराठी सक्तीवरून मुंबईत राजकारण तापलं; मुंडेंचा मराठी माणसालाच इशारा?.
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका.