AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्यांना थंडी एन्जॉय करूद्या; आमच्याकडे फोटो आलेत’, आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दावोसच्या दौऱ्यावर गेले आहेत. पण त्यांच्या दावोसच्या दौऱ्यावरुन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोठा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याचे आपल्याकडे फोटो आल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

'त्यांना थंडी एन्जॉय करूद्या; आमच्याकडे फोटो आलेत', आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
aaditya thackeray and eknath shinde
| Updated on: Jan 18, 2024 | 8:43 PM
Share

मुंबई | 18 जानेवारी 2024 : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोसच्या दौऱ्यावर गेले आहेत. याच दौऱ्याचे फोटो आपल्याकडे आल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे “मुख्यमंत्र्यांना सध्या दावोसमध्ये थंडी एन्जॉय करुद्या. ते महाराष्ट्रात आल्यावर आम्ही वातावरण गरम करु. आमच्याकडे सर्व फोटो आले आहेत”, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरुन आगामी काळात काय-काय आरोप-प्रत्यारोप होतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

ठाकरे गटाचे आमदार राजीन साळवी यांच्या घरी आज एसीबीच्या पथकाने धाड टाकली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल आठ तास राजन साळवी यांच्या घराची झाडाझडती घेतली. त्यानंतर एसीबीचं पथक राजन साळवी यांना घेऊन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत घेऊन गेलं. राजन साळवी यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या कागदपत्रांची छाननी एसीबी अधिकाऱ्यांनी केली. राजन साळवी यांच्याविरोधात एसीबीने गुन्हा देखील दाखल केला आहे. त्यांच्यावर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. असं असलं तरी राजन साळवी यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतलेली नाही.

आपण अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात जाणार नाही. एकवेळ पोलीस कस्टडीत जायला आपण तयार आहोत. आपण काहीच चुकीचं वागलेलं नाही. त्यामुळे एसीबीच्या कारवाईला सामोरं जात आहोत. त्यांनी अटक केली तर सामोरं जायला तयार आहोत, अशी भूमिका साळवी यांनी घेतली आहे. साळवी यांच्यावरील कारवाईवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या दावोसच्या दौऱ्याचे फोटो बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे.

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“सत्यासाठी काम करणाऱ्यांना अटक केली जाते. देश यांना बरोबर उत्तर देणार आहे. घाबरणारे हुकुमशाह आपल्याविरोधात बोलणाऱ्याला अटक करत होते. हिटलरसारखच भाजप पक्ष घाबरलेला आहे. जेवढी हुकुमशाही राजवट पोकळ असते, तेवढं यंत्रणाचा वापर करतात. देश या हुकुमशाही करणाऱ्यांना दाखवणार आहे. लोकशाहीसाठी लढणाऱ्यांना हैराण केलं जातं आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“दावोसमध्ये दोन पत्रकारांना आणि काही जणांना आणि दलालांना दावोसला नेलेलं आहे. आम्हाला सर्व माहिती मिळालेली आहे. आमच्याकडे फोटोस आलेले आहेत. आता सध्या त्यांना थंडी एन्जॉय करूद्या. ते आल्यावर आम्ही वातावरण गरम करणार आहोत. सगळे फोटो वैगरे आमच्याकडे आलेले आहेत. दावोसचे करार आम्हाला माहिती आहे”, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.