AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंमत असेल तर वरळीतून लढून दाखवाच; आदित्य ठाकरे यांचं पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना चॅलेंज

मी राजीनामा देतो. तुम्हीही राजीनामा देऊन मैदानात या. जी काही यंत्रणा लावायची ती लावा. जी ताकद लावायची ती लावा. जेवढे खोके लावायचे ते लावा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही.

हिंमत असेल तर वरळीतून लढून दाखवाच; आदित्य ठाकरे यांचं पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना चॅलेंज
aaditya thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 04, 2023 | 9:52 AM
Share

मुंबई: ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना थेट राजीनामा देण्याचं आव्हानच दिलं आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मी चॅलेंज दिलेलं आहे. मी वरळीतून राजीनामा देतो. हिंमत असेल तर तुम्ही माझ्या विरोधात वरळीत उभं राहा. निवडून कसं येता ते बघतोच, असं आव्हानच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आदित्य ठाकरे यांचं आव्हान स्वीकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वरळीतील एका कार्यक्रमातून बोलताना त्यांनी हे आव्हान दिलं.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलं. मी राजीनामा देतो. तुम्हीही राजीनामा देऊन मैदानात या. जी काही यंत्रणा लावायची ती लावा. जी ताकद लावायची ती लावा. जेवढे खोके लावायचे ते लावा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही. शिवसैनिक विकला जाणार नाही, असं सांगतानाच वरळीतून उभं राहा. तुम्हाला पाडणारच, असं आव्हानच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.

निवडून येताच कसे ते पाहतो

यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांनाही आव्हान दिलं आहे. 40 आमदारांनी गद्दारी केली. तुम्हाला आव्हान आहे आमदारकीचा राजीमाना द्या. गद्दार खासदारांना आव्हान आहे. तुम्हीही खासदारकीचा राजीनामा द्या. निवडून येताच कसे ते पाहतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पारदर्शक सरकार म्हणजे काय?

आदित्य ठाकरे यांनीही दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारवर टीका करताना ठाकरे सरकारची स्तुती केली होती. पारदर्शक सरकार म्हणजे काय? लोकांचं सरकार म्हणजे काय? हे महाराष्ट्राने गेल्या अडीच वर्षात पाहिलं आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

खरी गुंतवणूक आणली

आम्ही डाव्होस दौरा केला. पण आम्ही खरी गुंतवणूक आणली. घटनाबाह्य सरकारसारखी बोगस गुंतवणूक आणली नाही. घटनाबाह्य सरकार चेहरा दाखवू शकत नाही. म्हणून मुखवटा लावून फिरत आहेत. कोव्हिड नसताना खोटा मास्क लावून फिरत आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.

त्यांना रोखायचंय

‘आपला दवाखाना’ शिवसेनेने सुरू केलेला आहे. या गद्दारांनी नाही, असंही त्यांनी ठणकावलं आहे. मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचं या हेतूने काम करणाऱ्यांना आता आपल्याला रोखायचं आहे, असं आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केलं होतं.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.