AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या मनातील एकच प्रश्न, राज ठाकरे सोबत यावेत काय?; आदित्य ठाकरे यांचं थेट उत्तर काय?

सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला तर सर्व गद्दार आमदार अपात्र होतील. केव्हा ना केव्हा ते अपात्र होतीलच. चाळीस लोकांपैकी एकाने सुद्धा म्हटले नाही की आम्ही 50 खोक्यांना हात लावला नाही.

महाराष्ट्राच्या मनातील एकच प्रश्न, राज ठाकरे सोबत यावेत काय?; आदित्य ठाकरे यांचं थेट उत्तर काय?
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 23, 2023 | 6:49 AM
Share

नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : शिवसेनेत बंड होण्यापूर्वीपासून आणि बंडानंतरही एकच प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. तो प्रश्न महाराष्ट्रभरातून विचारला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे काय? प्रत्येक मराठी माणसाला पडलेला हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर माजी पर्यावरण मंत्री आणि ठाकरे घराण्यातील महत्त्वाची व्यक्ती असलेल्या आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. आता जे सोबत आहेत. तेच आमचं कुटुंब आहे, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे सोबत यावेत का? या प्रश्नाला थेट उत्तर दिलं. आता जे आमच्या सोबत आहेत तेच आमचं कुटुंब आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे राजकीय विरोधक आहे. मात्र, ते अजूनही आमचे मित्रच आहेत. आमच्यात कधीच कटुता नव्हती. आम्ही कधीच कोणती गोष्ट पर्सनल घेत नाही. तसं आमच्या घरातील वातावरण आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

वैयक्तिक शत्रूत्त्व नाही

आतापर्यंत शिवसेनेवर अनेक आरोप झाले. मात्र आम्ही उत्तरं देताना कधीच चुकीची वक्तव्ये केली नाही. कधीच राजकीय चुकीची विधाने केली नाही. फडणवीस आणि आम्ही राजकारणात विरोधक आहोत. पण आमचं वैयक्तिक शत्रूत्व नाही, असं आदित्य यांनी स्पष्ट केलं.

जे सोबत येतील त्यांना घेऊ

वंचितसोबतच्या युतीवरही त्यांनी भाष्य केलं. महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमचे मित्र आहेत. जो आमच्यासोबत येत असेल तर त्यांना आम्ही सोबत घेऊन जाणार, असं त्यांनी स्पष्ट केलं.

कधी ना कधी अपात्र होणारच

सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला तर सर्व गद्दार आमदार अपात्र होतील. केव्हा ना केव्हा ते अपात्र होतीलच. चाळीस लोकांपैकी एकाने सुद्धा म्हटले नाही की आम्ही 50 खोक्यांना हात लावला नाही. जर कोणती चोरी नाही केला तर समोर येऊन सांगा. सुरत, गुवाहाटी, गोव्याला पळून गेला. अजूनही सेक्युरिटी घेऊन फिरता याचा अर्थ काय होतो? असा सवाल त्यांनी केला.

म्हणून जंगल घोषित केलं

आरेच्या कारशेडवरही त्यांनी पुन्हा भाष्य केलं. आरेची गोष्ट साफ होती. आम्ही जंगल घोषित केलं होतं. कारशेडची ती जागा होती. ती हलवण्यात यायला हवी होती. आधी तिथे पाच लिओ पोर्ट आहेत. मग जंगल आहे. त्यामुळे ते नष्ट का करावे ही आमची भूमिका होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा