AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अबू आझमी म्हणतात, पुणे, ठाणे, नवी मुंबईला ‘ही’ नावं द्या!

मुंबई: शहरांच्या नावाच्या नामांतराचा मुद्दा देशभर गाजत आहे. नावं बदलण्याची हवा उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात पोहोचली आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाच्या मागणीनंतर विद्येचं माहेरघर पुणे शहराचं नाव बदलण्याची मागणी झाली. विविध पक्ष, संघटनांनी शहरांची नावं बदलण्याची मागणी केली. त्यानंतर आता समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनीही नामांतर वादात उडी घेतली आहे. अबू आझमींनी […]

अबू आझमी म्हणतात, पुणे, ठाणे, नवी मुंबईला 'ही' नावं द्या!
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM
Share

मुंबई: शहरांच्या नावाच्या नामांतराचा मुद्दा देशभर गाजत आहे. नावं बदलण्याची हवा उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात पोहोचली आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाच्या मागणीनंतर विद्येचं माहेरघर पुणे शहराचं नाव बदलण्याची मागणी झाली. विविध पक्ष, संघटनांनी शहरांची नावं बदलण्याची मागणी केली. त्यानंतर आता समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनीही नामांतर वादात उडी घेतली आहे. अबू आझमींनी नवी मुंबई, ठाणे आणि पुणे शहराचं नाव बदलण्याची मागणी केली. या तीनही शहरांना अबू आझमींनी नवी नावं सूचवली आहेत.

नवी मुंबई शहराचं नाव छत्रपती शिवाजी महाराज करा, ठाण्याचं नाव जिजामाता आणि पुण्याचे नाव छत्रपती संभाजी महाराज करा, असं अबू आझमी विधानसभेत म्हणाले. अबू आझमींनी थेट विधानसभेतच ही मागणी केली.

अबू आझमी म्हणाले, “नवी मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या, ठाण्याला जिजाबाईंचं तर पुण्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्या”

शहरांच्या नामांतराचं वारं

यापूर्वी औरंगाबादचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी ही भूमिका मांडली आहे. “योगी आदित्यनाथ यांनी फैजाबादचे अयोध्या केले, अलाहाबादचे प्रयाग तिर्थ केले, मुख्यमंत्री देवेंद्रजी औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशीव कधी करणार? असं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 7 नोव्हेंबर रोजी केलं होतं.

त्यानंतर पुण्याचं नाव बदलून जिजापूर करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली. याबाबतचं पत्र राज्य सरकारला पाठवलं जाणार आहे. राज्य सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर, उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशीव आणि पुणे शहराचे ‘जिजापूर’ करावं, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. पुणे शहराला जिजाऊंचा वसा आणि वारसा असल्यामुळे संभाजी ब्रिगेडकडून मागणी करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात शहारांची नावं बदलली 

 उत्तर प्रदेशात शहरांची नावं बदलण्याचा सपाटा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लावला आहे. नुकतंच फैजाबाद शहराचं नाव बदलून अयोध्या करण्यात आलं आहे. तर काही दिवसांपूर्वीच अलाहाबादचं नाव प्रयागराज करण्यात आलं होतं. एवढंच नाही, तर यानंतर अनेक शहरांची नावं बदलण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

संबंधित बातम्या 

पुण्याचं नाव जिजापूर करा, संभाजी ब्रिगेडची मागणी  

‘औरंगाबादचं संंभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव करा’

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.