राज्यपालांचे सूर बदलले, वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपालांची स्तुतीसुमनं…

भारतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या माणसांनी देशाला समृद्ध केले आहे असंही मत त्यांनी व्यक्त केले.

राज्यपालांचे सूर बदलले, वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपालांची स्तुतीसुमनं...
राज्यपालांविरोधात रिट याचिका दाखल
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 6:27 PM

मुंबईः काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केल्यामुळे वादात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करणारे विधान केले आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याचा गौरव करत, शिवराय, महाराणा प्रताप यांच्या प्रयत्नामुळे भारत जगात स्वाभिमानाने उभा आहे असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. भारताची संस्कृती आजरामर आहे असंही त्यांनी बोलताना सांगितले आहे.

भारतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या माणसांनी देशाला समृद्ध केले आहे असंही मत त्यांनी व्यक्त केले.

भारतातील क्रांतीकारी लोकांमुळेच भारत आज स्वाभिमानाने जगात उभा आहे. या क्रांतिकारी लोकांमुळे देशाची संस्कृती जगभरात अमर असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि नितीन गडकरी, शरद पवार यांची तुलना केली होती. त्यामुळे राज्यात प्रचंड वाद उफाळून आला होता. शिवसेने काँग्रेस, राष्टवादी पक्षांकडून राज्यपाल आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता.

छत्रपती शिवाजी महाराज आणि नितीन गडकरी, शरद पवार यांची तुलना केल्यानंतर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. यावेळी शिंदे गटाकडून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता.

गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. त्यानंतर आजच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्या नावाचा गौरव करुन त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.