AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोव्हेंबरमधील पावसाने मुंबईकरांना वाचवले, प्रदूषणाची पातळी घटली

Mumbai Air Pollution | मुंबईत गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने मुंबईकरांना चांगला दिलासा दिला आहे. मुंबईतील हवेतील प्रदूषण कमी झाले आहे. मुंबईतील प्रदूषण कमी झाले नाहीतर विकास कामे थांबण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. परंतु एका पावसाने सर्वकाही बदलले.

नोव्हेंबरमधील पावसाने मुंबईकरांना वाचवले, प्रदूषणाची पातळी घटली
Mumbai RainImage Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 10, 2023 | 12:27 PM
Share

मुंबई | 10 नोव्हेंबर 2023 :  दिवाळीचा उत्सव सुरु झाला असताना मुंबईकरांवर प्रदूषणाचे संकट आले होते. मुंबईत हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्रदूषणाचा एक्यूआय 200 वर गेला होता. मुंबईतील प्रदूषणाची ही सर्वोच्च पातळी होती. चार दिवसांत प्रदूषणाची पातळी सुधारा, अन्यथा विकास कामे बंद करु, असे खडे बोल उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई मनपाला सुनावले होते. त्यानंतर राज्य सरकार सक्रीय झाले. राज्य सरकारने प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने बैठक घेतली. शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अगदी कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले होते. परंतु एका पावसाने मुंबईकरांची चिंता मिटवली.

प्रदूषणाची गुणवत्ता सुधारली

मुंबईतील प्रदूषणाची गुणवत्ता सुधारली आहे. मुंबईत गुरुवारी रात्री पाऊस झाला. मुंबईतील अनेक भागांत तासभर झालेल्या या पावसामुळे मुंबईची हवेची गुणवत्ता सुधारली आहे. या पावसामुळे 200 च्या वर गेलेला एक्यूआयची गुणवत्ता सुधारली आहे. आता हा एक्यूआय 94 वर आला आहे. यामुळे मुंबईकरांना श्वास घेणे सोपे झाले आहे. मुंबई हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. मुंबईचे तापमान शुक्रवारी 24 ते 30 अंश सेल्सियस होते.

कसा हवा एक्यूआय

  • 0 ते 50 चांगला
  • 51 ते 100 समाधानकारक
  • 101 ते 200 मध्यम
  • 201 ते 300 वाईट
  • 301 ते 400 अतिशय वाईट
  • 401 ते 500 धोकादायक

उल्हासनगर धोकादायक पातळीवर

उल्हासनगरने प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईलादेखील मागे टाकले आहे. मुंबईची हवेचा गुणवत्ता घसरली असताना उल्हासनगर येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा गुरुवारी २०० च्या वर गेला होता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर ही नोंद करण्यात आली होती. प्रदूषणाच्या बाबतीत उल्हासनगरने मुंबईलादेखील मागे टाकले होते. यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षावर मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी काय-काय उपाययोजना करता येतील? यासाठी बैठक घेतली. यावेळी रस्त्यावर धूळ, बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ आणि माती दिसता कामा नये, असे स्पष्ट आदेश दिले. तसेच हजार टँकरच्या माध्यमातून मुंबईतील सर्व रस्ते पाण्याने धुवावे, असे आदेश दिले. परंतु पावसामुळे सध्या त्याची गरज पडली नाही.

Follow Us
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?