AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshya Tritiya: सालदार निवडीची अनोखी परंपरा, अक्षय तृतीयेला मोठा गोटा उचलून ठरते वर्षभराच ‘पॅकेज’, नंदुरबारमध्ये ताकदीवर शेतगडी निवडीचा खेळ

Akshya Tritiya Nandurbar Saalgadi: जर कामगार, सालदार, शेतगडी ठेवायचा तर आपण एक करार करतो. शेतातील वाटा अथवा वर्षाचे पैसे, कपडालत्ता दिल्या जातो. पण या जिल्ह्यात अनोखीच प्रथा आहे. इथं सालदार निवडीसाठी वेगळीच कसोटी आहे. तरच सालदार मालदार होतो.

Akshya Tritiya: सालदार निवडीची अनोखी परंपरा, अक्षय तृतीयेला मोठा गोटा उचलून ठरते वर्षभराच 'पॅकेज', नंदुरबारमध्ये ताकदीवर शेतगडी निवडीचा खेळ
सव्वा मण उचला दगड, व्हा मालामालImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 19, 2026 | 2:43 PM
Share

Nandurbar Unique Tradition: अक्षय तृतीयेनिमित्त सगळीकडं उत्साहाचं वातावरण आहे. अनेक मंदिरं आंब्यांची आरस करून सजवली आहेत. आज अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्यात येते. त्यामुळे ती अक्षय, नष्ट न होणारी राहते, अशी मान्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी शेतात सालगडी, सालदार, शेतगडी नेमला जातो. त्यासाठी वर्षभराचा करार करण्यात येतो. शेतातील धान्याचा वाटा, काही पैसे अथवा मोठी रक्कम, कपडेलत्ते असा हा करार असतो. त्याचवेळी नंदुरबारमध्ये एक अनोखी प्रथा, परंपरा जपली आहे. येथे सालगडी होण्यासाठी मोठी कसोटी द्यावी लागते. त्यात पास होणाऱ्याला सालदारच नाही तर मालदार होता येते.

90 किलोचा उचला दगड, व्हा मालदार

शेतात सालगडी म्हणून निवडीसाठी नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात सव्वा मण म्हणजे 90 किलोचा दगड उचलावा लागतो. वर्षांनुवर्षे ही परंपरा जपली गेली आहे. जो सालगडी, सालदार, शेतगडी सर्वात वजनदार दगड उचलेल त्याला तसाच दमदार दाम मोजून दिला जातो. त्याला सर्वाधिक रक्कम मिळते. ज्याला दगड उचलता आला नाही. त्यालाही शेतात काम मिळते. पण त्याला मोठी रक्कम दिली जात नाही. या अनोख्या परंपरेसाठी आणि सालगडी होण्यासाठी अनेक तरुण मेहनतीवर आणि आहारावर जोर देतात. अनेक जण सव्वा मण मोठा गोटा सहज उचलतात.

वर्षाभराचे ठरते पॅकेज

आजच्या AI च्या युगात कंपन्या कर्मचारी नियुक्तीसाठी अनेक सोपस्कार पार पडतात. त्यानंतर वर्षभराचे पॅकेज ठरवतात. त्यासोबत कर्मचाऱ्यांना काही सवलती आणि विशेष पॅकेजही दिल्या जाते. अगदी तसेच शेतीच्या कामासाठी सालदार नेमताना ही कसोटी पूर्ण करावी लागते. सालदाराने शेतात काम करण्याअगोदर त्याची ताकद आणि निग्रह जोखला जातो. त्यासाठी त्याला सर्वांसमक्ष अक्षय तृतीयेच्या मानाच्या दिवशी हा सव्वा मण दगड उचलावा लागतो. खानदेशात अक्षय़ तृतीयेला अनेक ठिकाणी ही परंपरा पाळली जाते. माळीवाड्यात वर्षानुवर्षे ही परंपरा जपली गेली आहे. आजही काही सालगड्यांनी ही कसोटी सहज पूर्ण केली. ताकद आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी मोठा दगड उचलून खांद्यावर घेतला.

60 हजार ते 1 लाखांहून अधिक पॅकेज

शेतगड्याची निवड करताना त्याची ताकद, चिकाटी आणि काम करण्याची क्षमता याची अनोख्या पद्धतीने चाचणी घेतली जाते. यावर्षी सालदारांचे पॅकेज साधारणपणे 60 हजार ते 1 लाख 10 हजार आणि त्यापेक्षाही अधिक आहे. वर्षाला कपड्याचे दोन जोड आणि काही धान्य देण्याची तरतूदही या पॅकेजमध्ये असते. तसेच त्याला सुट्टी आणि महत्त्वाच्या कामाच्यावेळी बाहेरगावी जाण्याची मुभा मिळते.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत