AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मरणशक्तीची गोळी कुणाला पाठवणार?, डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलं हे उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कुणाकडे असलं पाहिजे. अजित पवार की सुप्रिया सुळे. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी शरद पवार असं नाव सांगितलं.

स्मरणशक्तीची गोळी कुणाला पाठवणार?, डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलं हे उत्तर
| Updated on: Jul 17, 2023 | 6:56 PM
Share

मुंबई : झी मराठीच्या एका कार्यक्रमात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना अमोल कोल्हे यांनी विविध प्रश्नांची खुमासेदार उत्तरं दिली. अमोल कोल्हे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा कोथडा २८ व्या वर्षी बाहेर काढला होतो. मी शिवाजी महाराज यांची भूमिका केली तेव्हा २८ वर्षांचा होतो. संधी मिळाली म्हणून काम केलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कुणाकडे असलं पाहिजे. अजित पवार की सुप्रिया सुळे. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी शरद पवार असं नाव सांगितलं.

शरद पवार यांनी लागू केलं महिलांचं आरक्षण

शरद पवार यांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही. शरद पवार यांनी महिलांचे आरक्षण लागू केलं. त्यावेळी त्या कोणत्या जातीची महिला आहे, याचा विचार केला नाही. शरद पवार यांनी पुण्यातील हिंजवडी येथे आयटी पार्क सुरू केलं. त्यांनी हे सर्व सुरू केलं. त्यामुळे शरद पवार यांनी काय केलं, असं कसं म्हणता येईल, असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.

स्मरणशक्तीची गोळी नरेंद्र मोदी यांना

औषधाच्या काही गोळ्या आहेत. त्या कुणाला पाठवालं, असा प्रश्न अमोल कोल्हे यांना विचारण्यात आला. डोकेदुखीची गोळी कुणाला पाठवाल, या प्रश्नाला उत्तर देताना अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांना असं उत्तर दिलं. स्मरणशक्तीची गोळी कुणाला पाठवाल, या प्रश्नाचं उत्तर देताना अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असं उत्तर दिलं. कारण दरवर्षी दोन कोटी रोजगार येणार होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल होणार होतं. ती गोळी त्यांना पाठवणार असल्याचं कोल्हे म्हणाले.

नैराश्य कमी व्हावं, अशी गोळी होती. यावर खासदार अमोल कोल्हे यांनी लोकशाहीला फोन केला. यावेळी बोलताना म्हणाले, तू असण्यात १४० कोटी भारतीयांचं भवितव्य अवलंबून आहे. प्रश्न मनात होते म्हणून फोन केला. प्रश्न विचारण्याची मुभा नाहीय. कारण प्रश्न विचारले की ट्रोल धाड येते. देशद्रोह्याचा शिक्का मारून जाते आमच्या मस्तकावर.

कुठल्या तोंडाने म्हणायचे जय जवान जय किसान?

सीयाचीनला मायनस डिग्री सेल्सीअसमध्ये देशाचं रक्षण मुलगा करत असतो. त्याचा ७५ वर्षांचा बाप त्याच्या न्याय हक्कांसाठी दिल्लीत कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत असतो. आंदोलकांना निष्ठूर सत्ताधाऱ्यांच्या गाडीखाली चिरडले जाते. तेव्हा कुठल्या तोंडाने म्हणायचं जय जवान जय किसान, असा प्रश्नही अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.

वहिनींचा तुमच्यावर डॉक्टर म्हणून जास्त विश्वास आहे की, राजकारणी म्हणून. खरं तर दोन्ही नाही. मेडिकलचा टच सुटला आहे. बाहेर तुम्ही कितीची चांगले वक्ता असलात. जगातला कुठलाही वक्ता असला, तरी घरात तो श्रोता असतो, असं मिस्कील उत्तरं त्यांनी दिलं.

सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.