AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashish Shelar : 25 वर्षात कंत्राटदारांना पोसण्याचं काम शिवसेनेनं केलं, आशिष शेलार यांचा घणाघाती आरोप

मुंबई शहरामध्ये दिरंगाई आणि घोळ यापासून शिवसेनेचे नेते स्वतःचे हात बाजूला ठेवू शकत नाही, निकृष्ट दर्जाचे कोस्टल रोडवरचे काम असो वा मेट्रो तीनच्या माध्यमातून केलेला अहंकार, यातून मुंबईकरांच्या डोक्यावर जो भुर्दंड त्या ठिकाणी टाकला आहे, ते पाप शिवसेनेच्या माथ्यावरच आहे, असेही ते म्हणालेत. 

Ashish Shelar : 25 वर्षात कंत्राटदारांना पोसण्याचं काम शिवसेनेनं केलं, आशिष शेलार यांचा घणाघाती आरोप
Image Credit source: social media
| Updated on: Aug 12, 2022 | 6:07 PM
Share

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) हे आज दुसऱ्यांदा मुंबईच्या भाजपाध्यक्षपदी निवडले गेले आहेत. मुंबईच्या अध्यक्षपदी (BJP Mumbai President) निवड होताच त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. गेल्या तीन दशकात शिवसेनेकडून केवळ कंत्राटदारांना पोसण्याचं काम केलं गेलंय, अशा घणाघाती आरोप त्यांनी केलाय. तर आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC Election 2022) ही आम्हीच जिंकू असा विश्वासही व्यक्त केल्या. मुंबई शहरामध्ये दिरंगाई आणि घोळ यापासून शिवसेनेचे नेते स्वतःचे हात बाजूला ठेवू शकत नाही, निकृष्ट दर्जाचे कोस्टल रोडवरचे काम असो वा मेट्रो तीनच्या माध्यमातून केलेला अहंकार, यातून मुंबईकरांच्या डोक्यावर जो भुर्दंड त्या ठिकाणी टाकला आहे, ते पाप शिवसेनेच्या माथ्यावरच आहे, असेही ते म्हणालेत.

ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करू

त्यातून ते फळ काढू शकत नाही, शाळेतील संगणक खरेदी पासून सगळ्या विषयांवर महापालिकेतील आमचे सगळे सहकारी नेते अतिशय प्रामाणिकपणे काम करतात, मी मुंबईकरांना विश्वास देऊ इच्छितो, जे गेल्या 25 वर्षात तुमच्या मनामध्ये होतं, जे चित्र 25 वर्षात गेल्या तुमच्या डोक्यात तुम्ही रंगवलं होता ते तुमच्या मनातलं आणि तुमच्या डोक्यातलं चित्र संपूर्णपणे साकारण्याचे काम हे भारतीय जनता पार्टी करेल, आम्हाला मुंबईकरांचेही आशीर्वाद यासाठी नक्कीच मिळेल आणि म्हणून आमचं ठरलं आहे, भ्रष्ट व्यवस्थेने बरबटलेल्या उद्धवजींच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करायचं आहे आणि मुंबईकरांच्या मनातील स्वप्नातील डोक्यातील विकासाचे मुंबईचं चित्र रंगवून, त्या मुंबईकरांना सुपूर्त करायचे आहे, आजच्या प्रसंगी एवढेच म्हणेन अशी प्रतिक्रिया या पत्रकार परिषदेत शेलारांनी दिलीय.

महापालिका जिंकण्याची जबाबदारी आशिष शेलारांवर

काही दिवसातच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच पुन्हा मुंबईचे अध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड करण्यात आली आहे. गेल्यावेळी ही आशिष शेलार हेच मुंबईचे भाजपाध्यक्ष असताना महानगरपालिकेचे निवडणूक पार पडली होती. त्यावेळी भाजपच्या नगरसेवकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि तेच लक्षात ठेवून यावेळी ही महानगरपालिकेसाठी भाजपने तसाच प्लॅन आखला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेतून खाली उतरवण्यासाठी भाजपने चांगली तयारी केली आहे, त्यातच शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीचा भाजपला फायदा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यावेळच्या मुंबई महापालिका निवडणुकीला आणखी रंग आला आहे.

गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय.
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.