AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक निवडणूक काय जिंकली, शिवसेना पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहू लागलीय; आशिष शेलारांचा टोला

एक निवडणूक काय जिंकलीय शिवसेना पंतप्रधानपदाची स्वप्न पाहू लागलीय, असा टोला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला. (ashish shelar slams shiv sena over dadra nagar haveli by-election result)

एक निवडणूक काय जिंकली, शिवसेना पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहू लागलीय; आशिष शेलारांचा टोला
आशिष शेलार
| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 4:04 PM
Share

मुंबई: एक निवडणूक काय जिंकलीय शिवसेना पंतप्रधानपदाची स्वप्न पाहू लागलीय, असा टोला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला. शिवसेना नेते संजय राऊत तर कोटही शिवून बसले असतील, असा चिमटाही आशिष शेलार यांनी काढला.

आशिष शेलार यांनी मीडियाशी संवाद साधताना शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शेलार यांना दादरा नगर हवेलीतील शिवसेनेच्या विजयाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेनेने हुकूमशाहीबद्दल बोलावं म्हणजे दिवसाढवळ्या संध्याकाळचा आणि रात्रीचा चंद्र कसा दिसतो याचं वर्णन करण्यासारखं आहे. ते एक निवडणूक जिंकले. पण संपूर्ण देशात आम्हाला मोठं आव्हान उभं केलं, किंबहुना स्वप्नात पंतप्रधान बनण्याचीही स्वप्ने पडत असतील, मंत्रीमंडळाची रचनाही केली असेल, खातेवापटही केलं असेल, राऊत साहेब कोट शिवूनही बसले असतील. त्यामुळे तुमच्या स्वप्न रंजनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे, असा टोला शेलार यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांनी करून दाखवावं

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पंतप्रधानांनी देशवासियांना दिवाळीची भेट दिली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले आहेत. आंदोलन आणि माथी भडकावून लोकांना न्याय मिळणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करून दाखवले बोलण्यापेक्षा राज्यातील पेट्रोलचे दर आणखी कमी होऊ शकतात, ती इच्छाशक्ती राज्य सरकारने दाखवावी, असं आव्हानच त्यांनी दिलं. तसेच, राज्यात दोन वादळ झाली अतिवृष्टी झाली. मात्र अद्याप शेतकरी राजाला मदत मिळाली नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत करावी, भाजपा तुमच्या पाठिशी उभा राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

सत्ता आल्यानंतरच खंजीराची भाषा सूचते

यावेळी त्यांनी परमबीर सिंग यांच्या प्रतिज्ञापत्रावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. परमबीर सिंग यांनी पूर्वी दिलेले पुरावे पुरेसे आहेत. म्हणूनच या संदर्भात चौकशी करावी असे आदेश न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. यावर मी फार बोलणार नाही. कारण प्रकरण कोर्टात आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. सत्तेत आल्यानंतर या मंत्र्यांना खंजीराची भाषा सुचायला लागली आहे, असा टोला त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक यांना लगावला.

संबंधित बातम्या:

‘ते रोज लवंग्या फोडतात, आम्ही बॉम्ब फोडणार’, प्रसाद लाड यांचा ठाकरे सरकारला इशारा

‘फक्त घोषणा आणि भाषणं करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत’, रक्षा खडसे यांची ठाकरे सरकारवर टीका

अनिल परब शुद्धीत नव्हते, ईडीला काय कबुली जबाब दिला हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे काय?; किरीट सोमय्यांचा सवाल

(ashish shelar slams shiv sena over dadra nagar haveli by-election result)

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.