AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“लॉकडाऊनचा निर्णय लोकांच्या हातात, परिस्थिती अशीच राहिली तर रात्रीचे नियम सकाळी लावावे लागतीत”

अशीच परिस्थिती राहिली तर राज्यात सध्ये जे नियम रात्री लावलेले आहेत. ते सकाळी लावावे लागतीत," असे वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख म्हणाले. (aslam shaikh mumbai corona cases lockdown)

लॉकडाऊनचा निर्णय लोकांच्या हातात, परिस्थिती अशीच राहिली तर रात्रीचे नियम सकाळी लावावे लागतीत
अस्लम शेख
| Updated on: Mar 30, 2021 | 4:58 PM
Share

मुंबई : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील जनतेला वारंवार विनंती करत आहेत. जनतेने बाहेर पडू नये, नियम पाळावेत (Corona cases and lockdown) असे ते सांगत आहेत. मात्र, कोणाही ऐकत नाहीये. अशीच परिस्थिती राहिली तर राज्यात सध्या जे नियम रात्री लावलेले आहेत, ते सकाळी लावावे लागतीत,” असे वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) म्हणाले. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच राज्य सरकार लॉकडाऊन लागू करु शकतं, अशी चर्चासुद्धा आहे. या पार्श्वभूमीवर अस्लम शेख यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व आले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. (Aslam Shaikh statement on Corona cases and lockdown in Mumbai)

झोपडपट्टीपेक्षा इमारतींमध्ये जास्त कोरोना

यावेळी बोलताना अस्लम शेख यांनी मुंबईतील कोरोना परिस्थीतीवर चर्चा केली. त्यांनी मुंबईमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुबलक खाटा आहेत, असे सांगितले. तसेच मुंबईत रुग्णांवर उपचारासाठी 80 टक्के खासगी रुग्णालयात व्यवस्था केली आहे. लोकांना त्यांचे उद्योग सांभाळायचे आहेत. तसेच त्यांना त्यांचा जीवसुद्धा वाचवायचा आहे. झोपडपट्टी भागापेक्षा मोठ मोठ्या इमारतींमध्ये कोरोनाची रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, असेही ते म्हणाले.

लॉकडाऊन लोकांच्या हातात

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच संकेत मुख्यमंत्री उद्योग ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. याविषयी शेख यांनी अधिकचं स्पष्टीकरण दिलं आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी नियोजन कसं करायचं याबद्दल एक टास्क फोर्स काम करत आहे. राज्यात तसेच मुंबईत लॉकडाऊ हवा की नको हे लोकांच्या हातात आहे. लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊन लागू होणार नाही, असे अस्लम शेख म्हणाले.

भाजपकडून नुसतं राजकारण

यावेळी पुढे बोलताना त्यांनी कोरोना माहामारीबद्दल भाजपच्या भूमिकेवर बोट ठेवून ठेवलंय. त्यांनी भाजप नुसतं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. किराना दुकानं, मॉल्स, रेल्वे अशा ठिकाणी लोकांची जास्त प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे या ठिकाणी सकाळी गर्दी होऊ नये साठी काय व्यवस्था करावी याविषयी नियोजन सुरू आहे. देशात जेव्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला तेव्हा राज्याने स्थलांतरितांना मोठी मदत केली. पुन्हा जम्बो सेंटर सुरु करता येतील. कोरोनाला थोपवण्यासाठी सगळ्यांनी मिळूनच काळजी घेतली पाहिजे. भाजप यावर नुसतं राजकारण करत आहे. हा प्रश्न राजकीय नाहीये, अशी टीका अस्लम शेख यांनी भाजपवर केली.

दरम्यान, राज्यात तसेच मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात स्थिती नाजूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अस्लम शेख यांनी केलेलं लॉकडाऊनचा निर्णय लोकांच्या हातात आहे; या वक्तव्याला महत्त्व आले आहे.

इतर बातम्या :

Corona Cases and Lockdown News LIVE : काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना कोरोनाची लागण, ट्वीटरवरुन माहिती

LIVE | मुक्ताईनगर वडोदा वनक्षेत्रातील डोलारखेडा क्षेत्रात आग, कारण अस्पष्ट

(Aslam Shaikh statement on Corona cases and lockdown in Mumbai)

Follow Us
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी.
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........