AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bachchu Kadu : मंत्र्याचे फोन टॅप करणं हा नालायकपणा, मला कुणाच्या क्लिनचीटची गरज नाही; फोन टॅपिंग प्रकरणात बच्चू कडू आक्रमक

तस्करी करतो, असे सांगून फोन टॅप करण्यात आले होते. यावर आक्रमक भूमिका घेत बच्चू कडूंनी स्वत:चा बचाव केला आहे. अफू, गांजा तस्करीप्रकरणी संबंधित फोन टॅप करण्यात आले होते. माझ्या पीएचा फोन टॅप करण्यात आला होता, असे बच्चू कडू म्हणाले.

Bachchu Kadu : मंत्र्याचे फोन टॅप करणं हा नालायकपणा, मला कुणाच्या क्लिनचीटची गरज नाही; फोन टॅपिंग प्रकरणात बच्चू कडू आक्रमक
बच्चू कडूImage Credit source: Twitter
| Updated on: Aug 18, 2022 | 9:50 AM
Share

मुंबई : मला कुणाच्या क्लिनचीटची गरज नाही, असे वक्तव्य आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केले आहे. फोन टॅपिंग प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही त्यांनी आपले मत मांडले. मी नाराज नाही. पुढील मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet expansion) आपला विचार केला जाणार असल्याचा शब्द दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर निष्ठा ही पक्षावर नाही, तर सामान्य नागरिक, जनतेवर असली पाहिजे, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. ते मुंबईत बोलत होते. राज्यात सध्या फोन टॅपिंगचे (Phone tapping) प्रकरणही चर्चेत आहे. यात आता बच्चू कडू यांचे नाव आले आहे. याविषयी त्यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासोबत बच्चू कडू यांचाही फोन टॅप झाला होता.

‘चौकशी झाली तर काय घडले, ते सांगेन’

तस्करी करतो, असे सांगून फोन टॅप करण्यात आले होते. यावर आक्रमक भूमिका घेत बच्चू कडूंनी स्वत:चा बचाव केला आहे. अफू, गांजा तस्करीप्रकरणी संबंधित फोन टॅप करण्यात आले होते. माझ्या पीएचा फोन टॅप करण्यात आला होता. नेत्याचा फोन टॅप केला गेला, हा नालायकपणा आहे. दरम्यान, या प्रकरणात मला कोणत्याही अधिकाऱ्याच्या, पक्षाच्या क्लिनचीटची गरज नाही. अशी वेळ या बच्चू कडूवर येणार नाही. काही केले असेल तर सिद्ध करावे. त्यासाठी कोणाच्या पाया लागण्याची गरज नाही. माझा दुरून दुरून संबंध नाही, तर का म्हणून यावर चर्चा करायची, असा सवाल करत यावर चौकशी झाली तर काय घडले ते सांगेन, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

‘मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला’

मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मंत्रीपद न मिळाल्याने नाराज नसल्याचे कडू म्हणाले. आमचे काही मुद्दे आहेत. त्यावर आमची लढाई सुरू राहील. 15 सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे. माझ्या कामानिमित्त बाहेर असल्याने येवू शकलो नाही. व्यक्तीगत हितासाठी नाराज होणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनाही त्यांनी टोला लगावला. पक्षनिष्ठेवरून आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला होता. त्याविषयी विचारले असता पक्षनिष्ठा नाही तर जनतेशी निष्ठा महत्त्वाची असते, असा टोला त्यांनी लगावला.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.