AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युक्रेनमध्ये 4 मंत्री पाठवून इव्हेंट, यापूर्वीच सर्व मुलांना वाचवायला हवे होते; भुजबळांकडून मोदींना आहेर!

छगन भुजबळांनी यावेळी पुन्हा एकदा मंत्री नवाब मलिकांचे समर्थन केले. ते म्हणाले, नवाब मलिक यांच्यावर अन्याय झाला आहे, हे आम्हाला वाटते. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही. भाजप नेत्यांनी त्याचे राजकारण करावे, असा टोलाही त्यांनी हाणला. महाविकास आघाडी अभेद्य आहे. महाविकास आघाडीला काहीही होणार नाही.

युक्रेनमध्ये 4 मंत्री पाठवून इव्हेंट, यापूर्वीच सर्व मुलांना वाचवायला हवे होते; भुजबळांकडून मोदींना आहेर!
छगन भुजबळ आणि नरेंद्र मोदी.
| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 1:55 PM
Share

मुंबईः रशिया आणि युक्रेनमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले आहे. त्यानंतर आता युक्रेनमध्ये चार मंत्री पाठवून मोदी सरकार इव्हेंट करत आहे. खरे तर सर्व भारतीय मुलांना पूर्वीच वाचवायला हवे होते, अशी जोरदार टीका मंगळवारी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केंद्र सरकावर केली. भुजबळ म्हणाले की, रशिया-युक्रेनची लढाई (Russia-Ukraine war) सुरू झाली आहे आणि आता मोदी (Modi) सरकार बैठका घेत आहेत. यापूर्वीच खरे तर या सर्व मुलांना वाचवणे गरजेचे होते. अमेरिकेने ज्या पद्धतीने आधीच सर्व नागरिकांना बोलावून घेतले तसेच आपल्या देशानेही करायला हरकत नव्हती. आता चार मंत्री पाठवून इव्हेंट केला जातोय. याला काही अर्थ नाही. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा आणि मते मिळवायची अशा पद्धतीचे भाजपचं राजकारण आहे.

ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आम्हीही ओबीसी आरक्षणाच्या निकालाची वाट बघत होतो. आम्हाला कोर्ट आमच्या बाजूने निकाल देईल अपेक्षा होती. कारण आम्ही तिन्ही टेस्ट पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता हा निकाल बुधवारी येणार आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल अशा आम्हाला अपेक्षा आहे.

अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच

भुजबळ म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष पदाच्या संदर्भातला नियम विधिमंडळाने केलेला आहे आणि त्यात काही चुकीचे आहे असे म्हणण्याचे कारण नाही. हात वर करून मतदान करा, अशा पद्धतीचा कोर्टाने निकाल दिला होता. राज्यपालांनीही अध्यक्षपदाची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी, असे सांगितले होते. त्यामुळे या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक होईल असे वाटते आहे, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

मलिकांचा राजीनामा नाहीच

भुजबळांनी यावेळी पुन्हा एकदा मंत्री नवाब मलिकांचे समर्थन केले. ते म्हणाले, नवाब मलिक यांच्यावर अन्याय झाला आहे, हे आम्हाला वाटते. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही. भाजप नेत्यांनी त्याचे राजकारण करावे, असा टोलाही त्यांनी हाणला. महाविकास आघाडी अभेद्य आहे. महाविकास आघाडीला काहीही होणार नाही. विरोधक म्हणून भाजपने ज्या गोष्टी करायच्या असतात त्या कराव्यात, पण महाविकास आघाडी ला कुठलीही अडचण येणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

इतर बातम्याः

रशियाच्या राजनैतिक मिशनच्या 12 सदस्यांची हकालपट्टी, युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे मोठे पाऊल

tv9 Explainer: रशिया यूक्रेनमध्ये घुसला खरा पण गेल्या 5 दिवसात त्याला त्यात किती यश आलंय? समजून घेऊया 10 मुद्यांच्या माध्यमातून

Russia Ukrane War: तब्बल 64 KM चा रशियन ताफा, कीवला घेरण्यासाठी रशिया सज्ज

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.