AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक आयोगाच्या निकालानंतरही येणार मोठा ट्विस्ट, अजित पवार यांचा ‘तो’ सल्ला ठाकरे ऐकणार का?

प्रिम कोर्टाने सांगितलं आहे की 21 फेब्रुवारीपासून दोघांचं म्हणणं ऐकून घेऊन काय असेल तो निर्णय देतील. असं असताना एवढी घाई का केली? पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या निकालानंतरही येणार मोठा ट्विस्ट, अजित पवार यांचा 'तो' सल्ला ठाकरे ऐकणार का?
| Updated on: Feb 17, 2023 | 9:35 PM
Share

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाचा वाद निकाली काढला आहे. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह  देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. गेले दोन महिने दोन्ही गटांकडून पक्षाच्या नावासाठी आणि चिन्हासाठी कागदपत्रे देण्यात आली. अखेर आयोगाने निर्णय दिला असून शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण देत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा अनपेक्षित आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की 21 फेब्रुवारीपासून दोघांचं म्हणणं ऐकून घेऊन काय असेल तो निर्णय देतील. असं असताना एवढी घाई का केली?, हे कळायला मार्ग नाही. निवडणूक आयोगाने निकाल दिलेला असला तरी माझं असणं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे वरच्या कोर्टात जातील आणि त्यांच्याकडे न्याय मागतील. त्रयस्थ नागरिक म्हणून माझं मत आहे की, महाराष्ट्रातील शिवसैनिक हा जेव्हा निवडणूका लागतील तेव्हा त्यांच्याच पाठिशी उभा राहिल आणि त्यांच्या विचाराच्या उमेदवारांना निवडून देतील, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

शिवसेना कोणी काढली, बाळासाहेबानंतर शिवसेना कोणी पाहिली सर्वांना माहित आहे. आमदार, खासदार किंवा मंत्रीपद वाटताना सर्व निर्णय मातोश्री आणि मुंबईतील शिवसेना भवनातून घेतले जात होते. मी महाराष्ट्रात फिरतो त्यावेळी सर्वसामान्य शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांना मानणार असल्याचं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर आपली प्रतिक्रिया देताना निकाल धक्कादायक असल्याचं सांगितलं.

विश्वास कोणावर ठेवायचा काही कळत नाहीये, निवडणूक आयोग पारदर्शक आहे. हा निर्णय कसा झाला, ज्या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली त्यांनीच हयात असताना माझ्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना पाहतील असं सांगितलं होतं. त्यामुळे हा निर्णय धक्कादायक असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान,  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आता सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याचं म्हणाले आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.