AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फांदीवर बसलेल्‍यांनी आव्हानाची भाषा करु नये, नाहीतर…’, नारायण राणे यांनी रामदास कदम यांना सुनावलं

शिवसेना नेते रामदास कदम यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावरुन भाजपला इशारा दिलेला. केसाने गळा कापू नका, असं रामदास कदम म्हणाले होते. त्यांच्या टीकेला भाजप नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

'फांदीवर बसलेल्‍यांनी आव्हानाची भाषा करु नये, नाहीतर...', नारायण राणे यांनी रामदास कदम यांना सुनावलं
| Updated on: Mar 08, 2024 | 6:18 PM
Share

मुंबई | 8 मार्च 2024 : महायुतीच्या जागावाटपाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. भाजप तब्बल 35 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 8 आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला 3 ते 4 जागा मिळू शकतात, अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. विशेष म्हणजे या जागावाटपावरुन शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधला. केसाने गळा कापू नका, असं रामदास कदम भाजपला उद्देशून म्हणाले. त्यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं असतानाच आता भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी देखील रामदास कदम यांना सुनावलं आहे. “फांदीवर बसलेल्‍यांनी आव्हानाची भाषा करु नये, नाहीतर आपल्‍याच फडफडीने फांदी तुटून रामराम म्‍हणण्‍याची वेळ येईल”, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

“आमचे मित्रपक्ष आणि सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे , त्यांचा सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो. आम्ही केसाने गळा कापत नाही. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? जनमानसात आपले नाव असले पाहिजे. फांदीवर बसलेल्‍यांनी आव्हानाची भाषा करु नये, नाहीतर आपल्‍याच फडफडीने फांदी तुटून रामराम म्‍हणण्‍याची वेळ येईल”, अशा कडक शब्दांत नारायण राणे यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.

रामदास कदम काय म्हणाले होते?

“महाराष्ट्र भाजपच्या माध्यमातून इथे जे चाललं आहे ते अतिशय घृणास्पद चाललं आहे. माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान पकडले पाहिजेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचाच आहे. पण तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोकं आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका. मोदी-शाह यांच्याबाबत संबंध वेगळा मेसेज आपण भाजपकडून देत आहात. याचं भानदेखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे”, असं रामदास कदम म्हणाले होते.

रामदास कदम यांना फडणवीसांचं प्रत्युत्तर

रामदास कदम यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. “मी इतके वर्ष रामदास भाईंना ओळखतो. अशाप्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांना सवय आहे. त्यांची टोकाने बोलण्याची सवय आहे. ते कधीकधी रागानेदेखील बोलतात. भाजपने शिवसेनेचा नेहमी सन्मानच केलाय. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, आम्ही 115 आहोत, तरीदेखील आमच्याबरोबर आलेल्या शिंदेना मुख्यमंत्री केलं. कारण खरी शिवसेना आमच्याबरोबर आली याचं आम्हाला समाधान आहे”, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

Follow Us
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल.
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला.
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन.
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला.
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, मातोश्रीचं टेन्शन वाढताच...
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, मातोश्रीचं टेन्शन वाढताच....
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.