AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंडे कुटुंबाचं राजकारणातील अस्तित्व संपवण्यासाठी दिल्लीतून…; संजय राऊत यांचा मोठा दावा काय?

घर काढून घेतलं तरी राहुल गांधी देश-विदेशात लढत आहेत. देशाची स्थिती आहे, त्यावर आम्ही बोलत असू तर तो अपमान नाही. तुम्हीही 2014मध्ये तेच केलं आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

मुंडे कुटुंबाचं राजकारणातील अस्तित्व संपवण्यासाठी दिल्लीतून...; संजय राऊत यांचा मोठा दावा काय?
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 01, 2023 | 11:36 AM
Share

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रीय समाज पार्टीच्या कार्यक्रमात संबोधित करताना भाजप माझा पक्ष आहे. पण मी भाजपची थोडीच आहे, असं विधान केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोरच पंकजा मुंडे यंनी हे विदान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पंकजा यांच्या या विधानाचे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पंकजा यांनी जाणूनबुजून हे विधान केलं का? त्या वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत काय? पक्षात त्यांचं खच्चीकरण सुरू आहे काय? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे. ही चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबाचं राजकारणात अस्तित्व राहु नये म्हणून दिल्ली आणि महाराष्ट्रात हालचाली सुरू आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. पंकजा मुंडे या भाजपमध्ये आहेत. पण भाजप त्यांना आपलं मानत नाही. असं त्यांना म्हणायचं आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भाजप उभा करण्यासाठी रक्ताचं पाणी केलं. भाजपला आजचे दिवस गोपीनाथ मुंडे यांनी दाखवले. त्यांच्यासोबत बहुजन समाजातील नेते होते. बहुजन समाजातील या नेत्यांनी भाजप शून्यातून निर्माण केला. शिवसेनेशी युती केली, हा पक्ष सत्ताधारी केला. त्या मुंडे कुटुंबाचं अस्तित्व राजकारणात राहू नये यासाठी दिल्ली आणि महाराष्ट्रात मोठ्या हालचाली सुरू आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

संन्यास घ्यावा

पंकजा यांचा पराभव का आणि कसा झाला हे सांगण्याची गरज नाही. तो त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे. त्याविषयी सर्व जाणून आहेत. गोपीनाथ मुंडे असते तर भाजप-शिवसेना युतीला वेगळी दिशा मिळाली असती. आज जे चित्र आहे ते दिसलं नसतं. पण मुंडे नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची राजकारणात वाताहत केली जात आहे. ते मला स्पष्ट दिसतंय. अर्थात कुटुंबातील नेत्यांनी हिंमतीने, साहसाने निर्णय घेण्याची गरज असते. परिणामाची पर्वा काय होईल, परिणाम काय होतील याची पर्वा न करता निर्णय घ्यायचे असतात, तरच तुम्ही राजकारणात टिकू शकता. नाही तर तुम्ही राजकारण संन्यास घ्यावा. आमच्यावर अन्याय होतो अशा प्रकारच्या रडगाण्याला कुणीही विचारत नाही, असं राऊत यांनी सांगितलं.

बिहारला जाणार

बिहारमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. 12 जूनला नितीश कुमार यांनी सर्व मोठ्या नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. जे लोक भाजप सोबत नाही, ज्यांना 2024मध्ये बदल हवा आहे, अशा सर्व देशभक्त राजकीय पक्षांना त्यांनी निमंत्रण दिलं आहे. आम्ही पटणाला जाणार असल्याचा विचार करत आहोत, असं त्यांनी सांगितलं.

राहुल गांधी यांचं कौतुक

राहुल गांधी यांना अमेरिकेत मोठा रिस्पॉन्स मिळत आहे. त्यांना ऐकायला येणारे लोक भाड्याचे तट्टू नाहीत. राहुल गांधी फॉर्मात आहे. त्यांची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पूर्वी सचिन आणि सेहवाग असायचे तसे राहुल गांधी फॉर्मात आहेत. राहुल गांधी यांचे घर काढून घेतलं. पासपोर्ट काढून घेतला. तरीही एक नेता देश-विदेशात लढत आहे. संकट ही संधी असते असं त्यांना वाटतं. ते बरोबर आहे, असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर? 
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठं विधान
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे...
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावरील वाद... शिवतिर्थावर मोठं घडलं?
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चो
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चोरीबाबत राऊतांचं खळबळजनक ट्वीट
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही...
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही... संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत हे काय सांगून टाकलं?
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून...
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून केली पोलखोल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला अ्न... मुंबई लोकल हत्या प्रकरण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला अ्न... मुंबई लोकल हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...