AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded Loksabha ByPoll: नांदेडमध्ये मोठी उलथापालथ, शेवटच्या फेरीत असा झाला बदल

एप्रिल-मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभात प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत होती. त्या वसंत चव्हाण ५९ हजार ४४२ मतांनी विजयी झाले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा भाजपच्या खात्यात होती. त्यावेळी प्रतापराव गोविंदराव चिखलीकर खासदार झाले होते.

Nanded Loksabha ByPoll: नांदेडमध्ये मोठी उलथापालथ, शेवटच्या फेरीत असा झाला बदल
Narendra Modi
| Updated on: Nov 24, 2024 | 11:47 AM
Share

Nanded Lok Sabha By Election Result 2024 Updates: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश मिळवले. महायुतीचा विजयाचा हा पॅटर्न लोकसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीत दिसला. नांदेड लोकसभा मतदार संघात पाच महिन्यांपूर्वी काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला होता. परंतु पाच महिन्यात या निकालात मोठी उलथापालथ झाली आहे. पाच महिन्यानंतर ही निवडणूक अटीतटीची झाली. शेवटच्या फेरीत या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार रवींद्र चव्हाण 1457 मतांनी विजयी झाले. भाजपचे डॉ. संतुक हंबार्डे यांचा पराभव झाला. काँग्रेसला 586788 मते तर भाजपला 585331 मते मिळाली.

असा आला निकाल

नांदेड लोकसभा मतदार संघात एप्रिल मे महिन्यांत झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे वसंत चव्हाण विजयी झाले होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या दोन महिन्यांत वसंत चव्हाण यांचे निधन झाले. त्यामुळे नांदेडमध्ये पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण मैदानात होते. भाजपकडून डॉ. संतुक हंबार्डे मैदानात होते.

मागील निवडणुकीत काय झाले

एप्रिल-मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभात प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत होती. त्या वसंत चव्हाण ५९ हजार ४४२ मतांनी विजयी झाले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा भाजपच्या खात्यात होती. त्यावेळी प्रतापराव गोविंदराव चिखलीकर खासदार झाले होते.

नांदेड लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत विधानसभेच्या 6 जागा आहेत. या जागेवर १९५२ मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली होती. त्यावेळी काँग्रेसचे शंकरराव तेलकीकर विजयी झाले होते. त्यानंतर १९५७ च्या निवडणुकीत काँग्रेसने देवराव नामदेवराव कांबळे यांना तिकीट दिले आणि ते विजयी झाले. १९६२ मध्ये काँग्रेसचे तुळशीदास जाधव विजयी झाले. १९६७ च्या निवडणुकीत काँग्रेसने येथून उमेदवार बदलून व्यंकटराव तिरोडकर यांना उभे केले आणि ते विजयीही झाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.