AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Elections: मुंबईतील अतिरिक्त 9 वॉर्ड शिवसेनेला तारणार की भाजपला?; या निर्णयामागे नेमकं दडलं काय?

फेब्रुवारी 2022 च्या निवडणुकीपूर्वी मुंबई महापालिका मुंबईत नवीन प्रभाग जोडण्याचा विचार करत असल्याची घोषणा झाली तेव्हा भाजपने आरोप केला होता की हे शिवसेनेच्या सोयीसाठी केले जात आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे, पण भाजपसोबत युतीकरून. मात्र, यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.

BMC Elections: मुंबईतील अतिरिक्त 9 वॉर्ड शिवसेनेला तारणार की भाजपला?; या निर्णयामागे नेमकं दडलं काय?
BMC elections
| Edited By: Devashri Bhujbal | Updated on: Dec 04, 2021 | 1:42 PM
Share

मुंबईः बृहन्मुंबई महापालिकेतील (BMC new 9 wards) अतिरिक्त नऊ प्रभागांना राज्य सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. अशा प्रकारे, 2022 ला होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (elections) आता 227 ऐवजी एकूण 236 प्रभाग असतील. पालिका सुधारित प्रभागांच्या सीमांकनासह सज्ज झाली आहे. मात्र, अंतिम मसुदा मंजुरीसाठी आठवडाभरात राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला जाईल, अशी माहिती आहे. नवीन प्रभागांचे सीमांकन जाहीर झाल्यानंतर त्यावर रहिवाशांच्या सूचना व हरकती मागविण्यात येतील. त्यानंतर जागांच्या आरक्षणाची लॉटरीही काढली जाईल. या सर्व प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो, त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थिती, येत्या फेब्रुवारीमध्ये निवडणूक होणार आहे. पण, ते पुढे ढकलले जाऊ शकते. निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यास, निवडणुकीच्या तयारीसाठी अतिरिक्त वेळ मिळेल आणि अतिरिक्त निवडणूक प्रभागांचा राजकीय पक्षांना फायदाच होणार आहे.

अतिरिक्त प्रभागांमुळे राजकीय पक्षांना मदत

आता मुंबईत नऊ वॉर्ड वाढले असल्याने ते नियमानुसार शहरातील लोकसंख्येनुसार चिन्हांकित केले जातील. मतदानाच्या टक्केवारीत प्रभागांची फेररचना महत्त्वाची भूमिका बजावेल, हे निश्चित. फेब्रुवारी 2022 च्या निवडणुकीपूर्वी मुंबई महापालिका मुंबईत नवीन प्रभाग जोडण्याचा विचार करत असल्याची घोषणा झाली तेव्हा भाजपने आरोप केला होता की हे शिवसेनेच्या सोयीसाठी केले जात आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे, पण भाजपसोबत युतीकरून. मात्र, यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.

मुंबई महापालिकेतील सत्ताधारी पक्ष- शिवसेना आणि भाजप आता एकत्र राहिले नाहीत. 2019 च्या राज्य निवडणुकांनंतर, शिवसेनेने भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. त्यामुळे आता एक प्रकारे नगरपालिका निवडणुका भाजप एकट्याने लढत असून राज्यातील तीन प्रमुख पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे भाजप मनसेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे अलीकडे दिसून आले आहे.

एकूणच, यावेळच्या महापालिका निवडणुकीतील राजकीय डावपेच वेगळे होणार असून, अतिरिक्त निवडणूक प्रभागांमुळे चित्र अधिक बदलणार आहे.

2017 च्या निवडणुकीतही शिवसेना-भाजपमध्ये चुरशीची लढत

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत एकूण 227 वॉर्डांपैकी 105 वॉर्डांसाठी अत्यंत चुरशीची लढत झाली. 51 प्रभागातील उमेदवार केवळ 0 ते 5 टक्क्यांच्या फरकाने विजयी झाले. तर 54 प्रभागांसाठी 5 ते 10 टक्के मतदानाच्या फरकाने उमेदवार विजयी झाले होते. विशेष म्हणजे शिवसेनेचे नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर ज्यांना महापौरपदी नियुक्त करण्यात आले होते, त्यांनी त्यांच्या प्रभागात भाजपच्या उमेदवाराविरुद्ध अवघ्या 34 मतांनी विजय मिळवला.

शिवसेना आणि भाजपने मुंबई महापालिका निवडणूक एकट्याने लढवली आणि भाजपने शिवसेनेला अत्यंत चुरशीची लढत दिली. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मुंबईत भाजपने अनेक जागा जिंकल्या. निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांनी पुन्हा युती करून मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन केली. मात्र, राज्यात शिवसेना-भाजप हे पक्ष सध्या एकत्र नाहीत. आणि शिवसेनेची सध्या राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती आहे.

ही राजकीय जुळवाजुळव पाहता मुंबई महापालिका निवडणूक सर्वच पक्षांसाठी कमालीची उत्कंठावर्धक आणि चुरशीची होणार आहे.

इतर बातम्या-

Devendra Fadnavis: आमच्या आदर्शांनाच अपमानित केलं जात असेल तर साहित्य संमेलनात जाऊन काय करायचे?; फडणवीसांचा थेट सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्जिकल स्ट्राईकचा साक्षीदार लाल महालसुद्धा पुण्यात, पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला विसर पडला की काय? अमोल कोल्हेंचा सवाल

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश...

नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश..

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त.

Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?