AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narayan Rane: नारायण राणेंना 8 कमांडोंचं सुरक्ष कवच; केंद्राकडून राणेंना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राणेंना केंद्राने झेड सुरक्षा दिली आहे. यापूर्वी त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती.

Narayan Rane: नारायण राणेंना 8 कमांडोंचं सुरक्ष कवच; केंद्राकडून राणेंना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा
नारायण राणे, केंद्रीय मंत्री
| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 12:19 PM
Share

नवी दिल्ली: केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राणेंना केंद्राने झेड सुरक्षा दिली आहे. यापूर्वी त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. त्यामुळे राणे यांना आता दोन ऐवजी आठ जवानांची सुरक्षा असणार आहे.

नारायण राणेंना या पूर्वी वाय दर्जाची सुरक्षा होती. मात्र ठाकरे सरकारने राणेंना रत्नागिरीत अटक केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने राणेंच्या सुरक्षेचा आढावा घेत त्याबाबतचा अहवाल मागितला होता. त्यानंतर राणेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांना वाय वरून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. आधी राणेंच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफचे दोन कमांडो होते. आता त्यांची संख्या वाढून आठ झाली आहे.

काय घडलं होतं रत्नागिरीत?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

त्यामुळे राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, राणेंनी अटक होण्यापूर्वी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. तर मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्याने राणेंचा मुक्काम पोलीस ठाण्यात होणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी अटींसह जामीन मंजूर केल्यामुळे राणे यांना मोठा दिलासा मिळाला. जामीन मंजूर करताना महाड कोर्टानं काही अटी घातल्या होत्या. राणे यांना 15 हजार रुपयाच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता. तसंच त्यांना भविष्यात असं वक्तव्य करू नका असं निर्देश दिले होते.

संबंधित बातम्या:

Devendra Fadnavis: संजय राऊतांचे नेते बदलले; देवेंद्र फडणवीसांनी घेतली तीन नेत्यांची नावे

CCTV | कॉलेजबाहेर विद्यार्थ्यावर सपासप वार, नाशकातील हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

Satej Patil : सतेज पाटील कोल्हापूर जिल्हा बँकेतही बिनविरोध? विजयाची औपचारिकता बाकी

Follow Us
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी