AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती संभाजी कटाचा आणि षडयंत्राचा बळी ठरला; राष्ट्रवादीच्या नेत्यांनं सगळा इतिहास सांगितला

छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास साऱ्यांना सांगावा लागतो कारण आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराज याना तुम्ही कोंडून ठेवले होते म्हणून सगळा इतिहास आता उघड करावा लागतो असंही त्यांनी यावेळी बोलून भाजपला टोला लगावला आहे.

छत्रपती संभाजी कटाचा आणि षडयंत्राचा बळी ठरला; राष्ट्रवादीच्या नेत्यांनं सगळा इतिहास सांगितला
| Updated on: Feb 03, 2023 | 11:23 PM
Share

पुणेः हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हटले आणि सगळा महाराष्ट्र पेटून उठला. त्यांच्यावर विरोधकांनी प्रचंड टीका करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. स्वराज्यरक्षक या शब्दावरूनच राजकारण आणि इतिहास कसा घडला असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीचा सगळा इतिहास सांगितला.

यावेळी त्यांनी सांगितले की, ज्या संभाजी महाराज यांनी सतराव्या वर्षी राज्य चालवण्यासाठी पाऊल उचललं त्या संभाजी महाराज यांना कैकदा अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले आहे.

यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जेम्स लेन भारतात आला आणि त्यांनी मांडलेल्या इतिहासामुळे दादाजी कोंडदेव हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा गुरू नव्हता, तर तो त्यांच्या घरातील नोकर होता असं सांगितल्यामुळे साठ वर्षामध्ये खरा इतिहास समजला असल्याचे मत त्यांनी मांडले.

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज हे फक्त एका महाराजांचे बाळ नव्हते,

तर ते धैर्याने सगळ्या गोष्टींना सामोरे जाणारे, कवी कलशसारख्या मित्रासाठी स्वतःच्या वडिलांबरोबर वाद घालणारे आणि मित्रत्वाचा आदर्श सगळ्या जगासमोर दाखवून देणारे छत्रपती संभाजीमहाराज होते असंही त्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास साऱ्यांना सांगावा लागतो कारण आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराज याना तुम्ही कोंडून ठेवले होते म्हणून सगळा इतिहास आता उघड करावा लागतो असंही त्यांनी यावेळी बोलून भाजपला टोला लगावला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हणून त्यांनी त्यांचा उल्लेख केला आणि तोच त्यांचा खरा उल्लेख आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू झाला कारण छत्रपती संभाजी महाराज हे येथील षडयंत्राचे आणि कटाचे खऱ्या अर्थाने बळी ठरले आहेत. कारण त्यावेळी त्यांच्याजवळचे लोकं ही घरभेदी ठरले असल्याची टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.