AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची ‘गुड न्यूज’

Ladki Bahin Yojana: राज्यात लाडकी बहीण बंद होणार नाही. हीच नाही तर राज्यातील कोणतीही योजना बंद होणार नाही. या योजनेत पात्र असलेल्यांना पैसे दिले जातील. पंरतु नियमाच्या बाहेर जे आहेत, त्यांना या योजनेतून बाहेर ठेवावे लागणार आहे.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची 'गुड न्यूज'
Ladki Bahin YojanaImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 03, 2025 | 1:50 PM
Share

राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर ही योजना बंद होणार? अशी टीका विरोध पक्ष करत आहे. योजनेतून दहा लाख महिलांना वगळले, असा आरोप केला जात आहे. त्यावर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यात ही योजना बंद होणार नाही, असे रोखठोकपणे त्यांनी सांगितले. तसेच महिलांची संख्या कमी का झाली? त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्री काय म्हणाले…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात लाडकी बहीण बंद होणार नाही. हीच नाही तर राज्यातील कोणतीही योजना बंद होणार नाही. या योजनेत पात्र असलेल्यांना पैसे दिले जातील. पंरतु नियमाच्या बाहेर जे आहेत, त्यांना या योजनेतून बाहेर ठेवावे लागणार आहे. कारण ‘कॅग’ने त्याबाबत आपल्यावर टाकले बंधन आहे. त्यानुसार, पात्र लोकांनाच कोणत्याही योजनेची मदत करता येते. अपात्र लोकांना मदत करता येणार नाही. त्यामुळे यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही. विरोधकांचा आरोप चुकीचा आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेचे पैसे २१०० रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीत दिले होते. सध्या या योजनेत १५०० रुपये महिना पात्र महिलांना दिला जातो. आता २१०० रुपये करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. त्याबाबतचे संकेत यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले होते.

त्या लोकांना सोडणार नाही…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांना सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप विरोधक करत आहे, त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांच्याबद्दल कोणी चुकीचे बोलले तर त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. आम्हाला महाराज पूर्ण माहीत आहे. आम्ही महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर काम करणारे आहोत. महाराजांबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांना सोडले जाणार नाही. परंतु जे हा आरोप करत आहे, त्यांनी इशरत जहांच्या नावाने रुग्णवाहिका सुरू केली आहे. त्यामुळे त्या लोकांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबाबत सांगू नये, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.