AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निरोपाचं अधिवेशन म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले….

राज्यात विधीमंडळाचं अधिवेशन 27 जून म्हणजेच उद्या गुरूवारपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या एक दिवसाआधी सत्ताधारी विरोधकांना चहापानाचं निमंत्रण देतात. पण चहापानावर सत्ताधाऱ्यांनी बहिष्कार टाकला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेतली.  यावेळी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

निरोपाचं अधिवेशन म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले....
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे
| Updated on: Jun 26, 2024 | 8:48 PM
Share

पावसाळी अधिवेशनाआधीच सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. या अधिवेशनावर बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. खोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन सुरू होणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

एकनाथ शिंदे  काय म्हणाले?

निरोप द्यायला सभागृहात यावं लागणार की नाही. का फेसबुक लाईव्हवरून देणार आहात? निरोप द्यायचा की घ्यायचा आहे हे जनता ठरवत असते. आम्ही जनतेची सेवा केली असून आम्ही रस्त्यावरील आणि जमीनीसोबत जोडलेले कार्यकर्ते आहोत. जिथे जिथे आपत्ती येते तिथे आम्ही जातो, घरात नाही बसत. त्यामुळे लोकांना माहित आहे की काम करणार सरकार कोण आहे आणि फक्त खोटे आरोप करणार सरकार कोण आहे .शेवटच्या अधिवेशनात सर्वांनी भाग घ्यायला पाहिजे. राज्यातील जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यासाठी प्रत्येकाने आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडले पाहिजेत आणि त्याला न्याय मिळवून घेतला पाहिजे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

संविधान कधी बदलणा आहे का? आपलं संविधान हे जगात सर्वोत्तम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर संविधान कपाळाला लावलं आहे. बाळासाहेबांना काँग्रेसने दोनवेळा हरवलं, बाळासाहेब बोलायचे काँग्रेसचं जळकं घर आहे त्याच्यापासून दूर राहा. मोदींनी 2015 पासून संविधान दिन सुरू केला. मुंबईमधील इंदू मिल येथे जगाला हेवा वाटेल असं स्मारक उभारत आहोत. जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत संविधान कोणी बदलू शकत नाहीत, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

सर्वात जास्त पेपरफुटी  ठाकरे मुख्यमंंत्री असताना झाली- फडणवीस

सर्वात जास्त पेपरफुटी ही उद्धव ठाकरे मुख्यमंंत्री असताना झाली आहे. आता ते आम्हाला विचारत आहेत, जितक्या परीक्षा घेतल्या त्याचे रिपोटकार्ड आम्ही अधिवेशनात दाखवू. परकीय गुंतवणुकीत आमच्या काळात राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. विरोधकांनी प्रकल्पांवरून खोटा नरेटिव्ह सेट केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.