AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात महिनाभरातील पाऊस अवघ्या तीन दिवसांत, धरणातील जलसाठा वाढला

मुंबईसह राज्यात 4 दिवसात तब्बल 606 मिमी पेक्षा जास्त  पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात सरासरी 90 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे नागरिक हैराण झाले असले तरी, धरणांच्या पातळीत मात्र वाढ झाली आहे.

राज्यात महिनाभरातील पाऊस अवघ्या तीन दिवसांत, धरणातील जलसाठा वाढला
| Edited By: | Updated on: Jul 01, 2019 | 3:43 PM
Share

मुंबई : मुंबईसह राज्यभरात जोरदार पाऊस बरसयाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईसह इतर ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचले. आज (1 जुलै) मराठवाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही रेड अर्लट देण्यात आला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे नागरिक हैराण झाले असले तरी, धरणांच्या पातळीत मात्र वाढ झाली आहे.

दरम्यान मुंबईसह राज्यात 4 दिवसात तब्बल 606 मिमी पेक्षा जास्त  पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात सरासरी 90 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. दोन वर्षापूर्वी म्हणजेच 7 जून ते 30 जूनपर्यंत 23 दिवसांच्या कालावधीत राज्यात 991 मिमी पाऊस झाला होता. याची तुलना केल्यास यंदाच्या वर्षी 67 टक्के पाऊस हा फक्त अवघ्या चारच दिवसात पडला आहे.

तर दुसऱ्या बाजूला मुंबईतील कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार मागच्या 24 तासात 92.6 मिमी पर्यंत पाऊस पडला आहे. तर सांताक्रुझ वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 91.9 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर 1 जुलै 2019 पर्यंत मुंबईत कुलाबा भागात 433 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर सांताक्रुज भागात 607 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान गेल्यावर्षी जुलै 2018 मध्ये कुलाबा भागात  794.1 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर सांताक्रुझ परिसरात 749.2 मिमी पावसाची नोंद केली आहे. या आकडेवारीची तुलना केल्यास यंदाच्या वर्षी 60 टक्के पाऊस 1 जुलैपर्यंत पडला आहे. दरम्यान मागील 24 तासांत मुंबई शहरात 118 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुर्व उपनगरात 99.02 मिमी, तर पश्चिम उपनगरात 70.61 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सततच्या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक प्रमुख धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. मागील तीन ते चार दिवसातील पावसामुळे राज्यातील धरणाचा जलसाठा वाढवायला सुरुवात झाली आहे. कोकण, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती या ठिकाणच्या धरणात चांगलीच वाढ झाली आहे.

आतापर्यंत काही धरणातील साठ्यात 7 ते 8 टक्के वाढ झाली आहे. तर कोकणात धरणसाठा 3 टक्क्यांनी वाढला आहे. या शिवाय पुणे, नाशिक, नागपुर आणि अमरावती विभागातील धरणातला जलसाठाही वाढायला सुरुवात झाली झाली आहे.

Follow Us
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित.