AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सत्तेतील लोकांचा विरोधकांना संपवण्याचा डाव असेल तर हे भयानक”; काँग्रेस नेत्याकडून सरकारवर गंभीर आरोप

खासदार संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांकडे आपल्या जीवे मारण्याची सुपारी दिल्याची तक्रार दिली आहे. त्यामुळे राज्यातील सगळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 

सत्तेतील लोकांचा विरोधकांना संपवण्याचा डाव असेल तर हे भयानक; काँग्रेस नेत्याकडून सरकारवर गंभीर आरोप
| Updated on: Feb 21, 2023 | 6:06 PM
Share

मुंबईः खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याची तक्रार दिली आहे. त्यावरून आता राजकारण तापले आहे. संजय राऊत यांच्या या तक्रारीवरून आता विरोधकांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सत्तेतील लोकांचा विरोधकांना संपवण्याचा डाव असे तर हे भयानक असल्याची टीका नाना पटोले यांनी सरकारवर केली आहे.

महाराष्ट्रात या प्रकाराचे राजकारण कधीच नव्हते, मात्र आताच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून वेगळ्या प्रकारचे राजकारण केले जात आहेत. त्यामुळे त्यांनी ही परिस्थिती महाराष्ट्राला वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याची शक्यता आहे अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना सत्ताधारी लोकांची विरोधकांना संपवण्याची मानसिकता असल्याचे म्हटले आहे. या प्रकारचं राजकारण फुले, शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कधीच झाले नव्हते.

नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधताना खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांच्या प्रकरणाची सरकारने गांभीराय्ने चौकशी करण्याची गरज असल्याची मागमी केली आहे. या प्रकारे नेत्यांना संपवण्याचा डाव होत असेल तर हे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारे नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांकडे आपल्या जीवे मारण्याची सुपारी दिल्याची तक्रार दिली आहे. त्यामुळे राज्यातील सगळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

विरोधक आणि समर्थक या दोघांनीही संजय राऊत यांच्यावर मत व्यक्त केले असले तरी भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून पोलिसांना योग्य त्या सूचना द्याव्या असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

तर संजय राऊत यांच्या विरोधकांनी नरेश म्हस्के, प्रतोद भरत गोगावले यांनी या प्रकरणावरून सडकून टीका केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात  यावरून राजकारण तापणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.