AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही एकत्र लढणार”; काँग्रेसचा थेट भाजपला इशारा…

भाजपकडून सातत्याने महाराष्ट्रातील फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तत्कालीन राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे.

भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही एकत्र लढणार; काँग्रेसचा थेट भाजपला इशारा...
| Updated on: Jun 13, 2023 | 10:39 PM
Share

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजपच्या डझनभर मंत्र्यांकडून अपमान केला गेला आहे. तर कालच वारकरी संप्रदायावर या सरकारने अन्याय करुन त्यांनी आपली खरी वृत्ती दाखवली असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महाराष्ट्रमध्ये फुले,शाहू, आंबेडकर यांचा विचार संपवाण्याचा काम हे सरकार करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे. राज्यातील हे सरकार मनुवादी विचारसरणीचे सरकार आहे. त्यामुळेच डझनभर भाजपचा नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही माऊलींचा आदर करत त्याचा सन्मान केला होता. तर सध्याचे सरकार मात्र जाणीवपूर्वक याविरोधात वर्तन करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका करताना त्यांनी भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही सर्व एकत्रच निवडणुका लढविणार असून महाराष्ट्र हा भाजपमुक्त झालेला असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

यानिमित्ताने कर्नाटकमधील नागरिकांचेही आभार मानत त्यांनी मातोश्रीचेही त्यांनी आभार मानले आहेत. ज्या प्रमाणे कर्नाटकात काँग्रेसने बाजी मारली आहे, तसाच परिणाम आता महाराष्ट्रातही दिसेल असं मत त्यांनी व्यक्त केले.

भाजपकडून सातत्याने महाराष्ट्रातील फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तत्कालीन राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे.

तसेच महाराष्ट्रात वारकऱ्यांची प्रथा वर्षानुवर्षे चालत आली आहे, मात्र यावेळी नियोजनबद्ध पद्धतीने वारकरी संप्रदायावर लाठीचार्च करुन वारऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

मनुस्मृतीला पुरोगामी संतांनी विरोध केला होता, त्यामुळे या प्रथेला कसे बंद करता येईल यासाठी लाठीचार्ज केला गेला असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.