AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“या पोटनिवडणुकीत भाजपाने विकृत दर्शन घडवले”; काँग्रेस नेत्यानं भाजपवर गंभीर आरोप केले..

सत्ताधाऱ्यांवर टीका करताना नाना पटोले यांनी म्हटले की, उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्चयाकडून पैसे वाटणे ही भाजपाची संस्कृती नाही असं त्यांच्याकडून ठामपणे सांगण्यात आले होते.

या पोटनिवडणुकीत भाजपाने विकृत दर्शन घडवले; काँग्रेस नेत्यानं भाजपवर गंभीर आरोप केले..
| Updated on: Feb 27, 2023 | 6:32 PM
Share

मुंबईः पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. पोटनिवडणुकीचे मतदान होऊनही आता आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच काल पोटनिवडणुकीचे मतदान सुरू असताना भाजपकडून पैसे वाटप झाल्याचा आरोप करत संबंधित नेत्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे. त्यातच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांच्यावर गंभीर आरोपही करण्यात आले आहेत.

पोटनिवडणुकीच्या राजकारणावरून जोरदार आरोप करत नाना पटोले यांनी सांगितले की, रवींद्र धंगेकर हे आमचे उमेदवार आहेत. मात्र नुकताच झालेल्या निवडणुकीत रवींद्र धंगेकरच निवडून येतील असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.

यावेळी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना नाना पटोले यांनी म्हटले की, उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्चयाकडून पैसे वाटणे ही भाजपाची संस्कृती नाही असं त्यांच्याकडून ठामपणे सांगण्यात आले होते.

मात्र निवडणुकीच्या त्याच रात्री त्यांच्या नगरसेवकाला पैसे वाटताना पकडण्यात आले आहे. या प्रकारामुळेच भाजपने मतदारांना पैसे देऊन त्यांनी मत मिळवली आहेत अशी गंभीर टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

पोटनिवडणुकीत मतदारांना पैसे वाटून आणि भाजपची पैसे वाटण्याची संस्कृती नसल्याचे सांगण्यात येत असले तरी या निवडणुकीत भाजपने विकृत दर्शन दिले असल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.

पोटनिवडणुकीत मतं मिळवण्यासाठी भाजपकडून बेकायदेशीर पणे कोणत्याही गोष्टी करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच या पोटनिवडणुकीतील पैसे वाटण्यावरून भाजपाबाबत निवडणूक आयोगाकडे प्रचंड तक्रारी करण्यात आल्या आहेत अशी टीकाही करण्यात आली आहे.

भाजपबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या असल्याने सगळ्यात जास्त तक्रारी होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पोटनिवडणुकीत भाजपने आपले विकृत दर्शन दाखवले असल्यामुळेच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत न्यायालयाच्या आदेशाची पायमल्लीही करण्यात आल्याची गंभीर टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे.

Follow Us
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.