AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तेतून पायउतार झाल्यावर विरोधकांच्या डोळ्यासमोर अंधारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

कांद्याच्या निर्णय चर्चेप्रमाणे घेतला. नाफेडने खरेदी सुरू केली आहे. बांग्लादेशात निर्यात कर लावला आहे. रेल्वेने कांदा जातो. त्यासाठी रेल्वेमंत्र्यांशी बोलू.

सत्तेतून पायउतार झाल्यावर विरोधकांच्या डोळ्यासमोर अंधारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 03, 2023 | 2:32 PM
Share

मुंबई : सत्तेत येताच काय केलं, याची जंत्रीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत वाचली. सत्तेतून पायउतार झाल्यावर विरोधकांच्या डोळ्यात अंधारी आल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला. आमचं सरकार सकारात्मक निर्णय घेतंय. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते विधानसभेत बोलत होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास सुरू केला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा नागरिकांना लाभ होत आहे. मुंबईत मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ प्रकल्पाचा शुभारंभ केला. आतापर्यंत ६० लाख प्रवाशांनी मेट्रो प्रवासाचा फायदा घेतला. समृद्धी महामार्ग हा गेमचेंजर असल्याचंही त्यांनी सांगितलं. अभिभाषणावर बोलाल अशी अपेक्षा होती. विरोधकांनी विरोधकासारखं बोललं पाहिजे. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर अंधारी आली आहे. आम्ही जे काम करतो ते तुम्हाला दिसत नाही, असा हल्लाबोलही शिंदे यांनी केला.

मराठा समाजासाठी न्यायालयीन लढाई

कांद्याच्या निर्णय चर्चेप्रमाणे घेतला. नाफेडने खरेदी सुरू केली आहे. बांग्लादेशात निर्यात कर लावला आहे. रेल्वेने कांदा जातो. त्यासाठी रेल्वेमंत्र्यांशी बोलू. मराठा आरक्षण देण्याचा निर्णय झाला. उच्च न्यायालयानं वैध ठरवला. महाविकास आघाडीच्या काळात त्याला स्थगिती मिळाली. तज्ज्ञ वकिलांची फौज आम्ही तयार करतोय. तोपर्यंत त्यांच्यासाठी काही निर्णय घेतले आहेत. अडीच हजार नियुक्त्या देण्याचं काम केलं. मराठा समाजासाठी न्यायालयीन लढाई ताकदीनं लढत आहोत. सर्वांना सोबत घेऊन खंबीरपणे उभे राहिलो आहोत.

दाओसमधून येणार एवढी गुंतवणूक

एक लाख ३७ हजार कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक दावोसमधून येणार आहे. महाविकास आघाडीने १० हजार कोटींची गुंतवणूक आणली नाही. केंद्र आणि राज्य एकमेकांच्या विचाराने काम करत असल्याचं सांगितलं. परदेशी कंपन्या एमओयू साईन करतात त्यासाठी देशातीलही कंपन्या लागतात. नियमानुसार गुंतवणूक केली गेली. परदेशी गुंतवणूक येत आहे. एक लाखापेक्षा जास्त रोजगार मिळणार आहे. मोठ्या प्रमाणावर राज्यात उद्योग आले पाहिजे. रोजगार निर्मिती झाली पाहिजे. एनर्जी सेक्टरमध्ये गेल्यावेळी एमओयू ५० हजार कोटी रुपयांचा झाला होता. पण, तिथून एकही रुपयाची गुंतवणूक झाली नाही. आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल. त्यातून रोजगार निर्मिती होईल. राज्य सरकारने राज्याच्या हितासाठी निर्णय घेतले आहेत.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.