AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या पेयाला राष्ट्रीय ड्रींक जाहीर करा, आसामचे भाजपा खासदार पबित्रा मार्गेरिटा यांची मागणी

भारतात चहाला मोठा इतिहास आहे, चहा पहिल्यांदा 19 व्या शतकात ब्रिटीशांनी देशात आणला होता. त्या काळी भारतात चहाला इतकी मागणी नव्हती, तर दुध आणि इतर पेये अधिक लोकप्रिय होती.

या पेयाला राष्ट्रीय ड्रींक जाहीर करा, आसामचे भाजपा खासदार पबित्रा मार्गेरिटा यांची मागणी
Pabitra-MargheritaImage Credit source: Pabitra-Margherita
| Updated on: Dec 12, 2022 | 5:02 PM
Share

मुंबई : आसामचे भाजप खासदार पबित्रा मार्गेरिटा यांनी चहाला राष्ट्रीय पेय म्हणून घोषित करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. चहा भारतीय संस्कृतीचा एक भाग बनला आहे. रोजची सकाळ चहाच्या एका प्यालाने फ्रेश होते. या अशा आदरातिथ्याचा अविभाज्य घटक बनलेल्या चहाला राष्ट्रीय ड्रींक म्हणून जाहीर करावे अशी मागणी आसामचे भाजपा खासदार पबित्रा मार्गेरिटा यांनी सरकारकडे केली आहे.

चहा खरे तर परदेशातून येथे इंग्रज घेऊन आले होते. आता चहा हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे आणि देशातील अनेक लोकांची सकाळ चहा प्याला शिवाय ताजीटवटवीत होत नाही. देशातील अनेक भागांमध्ये चहा शिवाय पाहुणचार पुर्ण झाला असे मानत नाहीत. घरात आलेल्या पाहुण्यांना चहा देण्याची प्रथा आहे.

चहाचा उद्योगही देशासाठी रोजगार आणि कमाईचे प्रमुख साधन बनले आहे. आज भारत जगातील सर्वात मोठा चहाचा उत्पादक असून भारत चहाची सर्वात मोठी बाजारपेठही आहे. चहा हे कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीच्या पानांपासून बनवले जाणारे पेय आहे. पाण्यानंतर हे जगातील दुसरे सर्वाधिक सेवन केले जाणारे पेय आहे.

भारतात चहाला मोठा इतिहास आहे, चहा पहिल्यांदा 19 व्या शतकात ब्रिटीशांनी देशात आणला होता. त्या काळी भारतात चहा हे सामान्यपणे वापरले जाणारे पेय नव्हते, तर कॉफी आणि इतर पेये अधिक लोकप्रिय होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 19व्या शतकाच्या सुरुवातीस चीनमधून चहा आयात करण्यास सुरुवात केली आणि चीनकडून चहा आणण्याऐवजी भारतातच चहाची लागवड करण्याचा निर्णय ब्रिटीशांनी घेतला. यामुळे कालांतराने भारताच्या पूर्वेकडील भागात, विशेषतः आसाम राज्यात मोठ्या चहाच्या बागांची निर्मिती करण्यात आली.


Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.