AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या पेयाला राष्ट्रीय ड्रींक जाहीर करा, आसामचे भाजपा खासदार पबित्रा मार्गेरिटा यांची मागणी

भारतात चहाला मोठा इतिहास आहे, चहा पहिल्यांदा 19 व्या शतकात ब्रिटीशांनी देशात आणला होता. त्या काळी भारतात चहाला इतकी मागणी नव्हती, तर दुध आणि इतर पेये अधिक लोकप्रिय होती.

या पेयाला राष्ट्रीय ड्रींक जाहीर करा, आसामचे भाजपा खासदार पबित्रा मार्गेरिटा यांची मागणी
Pabitra-MargheritaImage Credit source: Pabitra-Margherita
| Updated on: Dec 12, 2022 | 5:02 PM
Share

मुंबई : आसामचे भाजप खासदार पबित्रा मार्गेरिटा यांनी चहाला राष्ट्रीय पेय म्हणून घोषित करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. चहा भारतीय संस्कृतीचा एक भाग बनला आहे. रोजची सकाळ चहाच्या एका प्यालाने फ्रेश होते. या अशा आदरातिथ्याचा अविभाज्य घटक बनलेल्या चहाला राष्ट्रीय ड्रींक म्हणून जाहीर करावे अशी मागणी आसामचे भाजपा खासदार पबित्रा मार्गेरिटा यांनी सरकारकडे केली आहे.

चहा खरे तर परदेशातून येथे इंग्रज घेऊन आले होते. आता चहा हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे आणि देशातील अनेक लोकांची सकाळ चहा प्याला शिवाय ताजीटवटवीत होत नाही. देशातील अनेक भागांमध्ये चहा शिवाय पाहुणचार पुर्ण झाला असे मानत नाहीत. घरात आलेल्या पाहुण्यांना चहा देण्याची प्रथा आहे.

चहाचा उद्योगही देशासाठी रोजगार आणि कमाईचे प्रमुख साधन बनले आहे. आज भारत जगातील सर्वात मोठा चहाचा उत्पादक असून भारत चहाची सर्वात मोठी बाजारपेठही आहे. चहा हे कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीच्या पानांपासून बनवले जाणारे पेय आहे. पाण्यानंतर हे जगातील दुसरे सर्वाधिक सेवन केले जाणारे पेय आहे.

भारतात चहाला मोठा इतिहास आहे, चहा पहिल्यांदा 19 व्या शतकात ब्रिटीशांनी देशात आणला होता. त्या काळी भारतात चहा हे सामान्यपणे वापरले जाणारे पेय नव्हते, तर कॉफी आणि इतर पेये अधिक लोकप्रिय होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 19व्या शतकाच्या सुरुवातीस चीनमधून चहा आयात करण्यास सुरुवात केली आणि चीनकडून चहा आणण्याऐवजी भारतातच चहाची लागवड करण्याचा निर्णय ब्रिटीशांनी घेतला. यामुळे कालांतराने भारताच्या पूर्वेकडील भागात, विशेषतः आसाम राज्यात मोठ्या चहाच्या बागांची निर्मिती करण्यात आली.


        
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.