मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas aghadi) सरकारने बहाणेबाजी न करता पेट्रोल-डिझेलवरचा व्हॅट कमी करून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा दिला पाहिजे आणि आपला खोटारडेपणा बंद केला पाहिजे, अशी टीका भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. पेट्रोल-डिझेल दरावरून त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की राज्य सरकारचा याबाबत दृष्टीकोन अत्यंत लघु आहे. त्यांना केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी उघडे पाडले आहे. एक लाख 20 हजार कोटी रुपये व्हॅटच्या रुपाने सरकारने कमावले. आता दराचा विषय आला तेव्हा केंद्रावर ढकलले जात आहे, अशी टीका त्यांनी केली. कोळसाटंचाई (Coal) तसेच केंद्राकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याची टीका महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली, त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर तोंडसुख घेत केंद्राची जबाबदारी झटकली आहे.