AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : आधी 5 वर्षे, नंतर 80 तास, आज फडणवीस तिसऱ्यांंदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, राज्यात पुन्हा मोठं सत्तांतर

हे सरकारही आता एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे कोसळलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता पुन्हा फडणवीस आणि शिंदे यांचं सरकार राज्याची धुरा सांभाळणार आहे. 

Devendra Fadnavis : आधी 5 वर्षे, नंतर 80 तास, आज फडणवीस तिसऱ्यांंदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, राज्यात पुन्हा मोठं सत्तांतर
आधी 5 वर्षे, नंतर 80 तास, आज फडणवीस तिसऱ्यांंदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, राज्यात पुन्हा मोठं सत्तांतरImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Jun 30, 2022 | 4:14 PM
Share

मुंबई– देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Oath) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे काही वेळात राजभवनावर राज्यपालांची (Governor Bhagat Singh Koshyari) भेट घेत आहेत. सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर संध्याकाळीच या दोघांचा शपथविधी होणार असल्याची ताजी माहित समोर आली आहे. साधेपणाने हा शपथिविधी पार पडणार आहे, असेही सांगण्यात आले आहे. राजभवनात दरबार हॉलमध्ये या हायव्होल्टेज शपथविधीची तयारी करण्यात आली आहे. या शपथविधीसाठी दरबार हॉलमध्ये माध्यमांनाही बोलावण्यात आले आहे. राज्यात पुन्हा एकदा मोठं सत्तांतर होत आहे. आज पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आणि एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. या शपथविधीसाठी भाजपाचे मोठे नेतेही राजभवनाकडे निघाले आहेत. काही वेळापूर्वीच सागर बंगल्यावर एकनाथ शिंदे पोहचल्यानंतर याठिकाणी भाजपाचे मोठे नेते उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार असे बडे नेते याठिाकणी उपस्थित होते. गेल्या काही दिवासांपासून राज्यातलं राजकीय वातावरण हे तापलेलं आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपासोबत जात असल्याचे यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

पाच वर्षे आणि 80 तास आणि आता पुढे…

2014 ते 2019 या काळात भाजपच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांचा पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. त्यानंतर पुन्हा भल्या पाहटे अजित पवारांसोबत शपथ घेत ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. मात्र शरद पवारांच्या डावपेचापुढे हे सरकार 80 तासांपेक्षा जास्त काळ टीकू शकले नाही. शेवटी बहुमत नसल्याने फडणवीसांना नाईलाजस्त राजीनामा द्यावा लागला आणि राज्यात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. मात्र हे सरकारही आता एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे कोसळलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता पुन्हा फडणवीस आणि शिंदे यांचं सरकार राज्याची धुरा सांभाळणार आहे.

नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

नव्या सरकारला माझ्या शुभेच्छा आहेत. नव्या मुख्यमंत्र्याला शुभेच्छा देण्याची आपल्यात पद्धत आहेत. आता ते पुन्हा येत आहे, असाही उल्लेख संजय राऊत यांनी केला आहे. सत्ताकारण थोडं बाजुला ठेवा आणि जनतेच्या हिताची कामं करा. भाजपने एक मोठा पक्ष फोडला आहे. इतर पक्षही सध्या चलबिचलमध्ये आहेत. आम्ही ते करू शकलो नाही. त्यामुळे आम्ही सत्ता गमावली आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच विधीमंडळातील बाबींवर इतर नेते बोलतील मी त्यावर बोलणार नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं