AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation | राज्यात 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद, किती गुन्हे दाखल, किती जणांना अटक? पोलीस महासंचालकांकडून महत्त्वाची माहिती

मराठा कार्यकर्ते मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये आंदोलनाला हिंसेचं वळण लागलं आहे. मराठा आंदोलकांकडून काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला पोलिसांचं सहकार्य असणार आहे. पण कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईल, असं राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी सांगितलं आहे.

Maratha Reservation | राज्यात 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद, किती गुन्हे दाखल, किती जणांना अटक? पोलीस महासंचालकांकडून महत्त्वाची माहिती
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 01, 2023 | 5:44 PM
Share

मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी राज्यातील काही भागांमध्ये वातावरण तापलं आहे. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. बीड जिल्ह्यात तर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यालाच आंदोलकांनी आग लावली. तर माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाला आंदोलकांनी आग लावली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याच्या परिसरातही जाळपोळ करण्यात आली. त्यांच्या गाडीला आग लावण्यात आली. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आली. या संचारबंदीत आज सकाळपासून शिथिलता देण्यात आलीय. पण जमावबंदी लागू आहे. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांकडून काय-काय कारवाई करण्यात आली याबाबत पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

“राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलनं झाली आहेत. काही ठिकाणी आंदोलनं शांततेत पार पडली आहेत. तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे. महाराष्ट्रात आंदोलकांकडून काही ठिकाणी कायद्याचं उल्लंघन करण्यात आलंय. तर काही ठिकाणी जाळपोळच्या घटनादेखील घडल्या आहेत. अशा ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच आरोपींना अटक देखील केलीय”, असं पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी सांगितलं.

“आतापर्यंत संभाजीनगर परिक्षेत्रात 29 ते 31 नोव्हेंबर तारखांच्या दरम्यान घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने 54 गुन्हे दाखल आहेत. तर 106 आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी बीड जिल्ह्यात 20 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील 7 गुन्हे हे कलम 306 अंतर्गत दाखल करण्यात आले आहेत”, अशी माहिती रजनीश शेठ यांनी दिली.

‘या’ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद

“बीड शहरात सध्या जमावबंदीचे आदेश आहेत. तसेच बीड, संभाजीनगर ग्रामीण आणि जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद आहे. महाराष्ट्रात 24 ते 31 नोव्हेंबरच्या दरम्यान एकूण 141 गुन्हे दाखल झाले आहेत आणि 168 आरोपींना अटक केली आहे. तर 146 आरोपींना कलम 41 नुसार नोटीस देण्यात आली आहे”, असं रजनीश शेठ यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात 12 कोटी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान

“संपूर्ण महाराष्ट्रात अंदाजे 12 कोटी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालंय. ज्या घटकांना अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्यांना अतिरिक्त मनुष्यबळ दिलेलं आहे. आतापर्यंत 17 एसआरपीएफच्या कंपनी आम्ही वेगवेगळ्या घटनांका दिले आहेत. तसेच रॅपिड अॅक्शन फोर्सची कंपनी बीड जिल्ह्यात दाखल झालीय. सात हजार होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत”, अशी माहिती रजनीश शेठ यांनी दिली.

“कायद्याचं उल्लंघन करणारे, सार्वजनिक मालेमत्तेच नुकसान करणारे, तसेच जाळपोळ करणाऱ्या असामाजिक तत्व यांच्यावर पोलीस कडक कारवाई करेल. तसेच शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला पोलीस सहकार्य करतील. पोलिसांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणारे आणि सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी आवश्यक ती कारवाई करावी”, असं रजनीश शेठ म्हणाले.

Follow Us
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार